शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 23:09 IST

कतर्नियाघाट जंगलाचा ४५ किमीचा पट्टा नेपाळच्या सीमेला लागून आहे. तर पूर्ण बहराइच जंगल ७० किमीच्या सीमेवर आहे. नेपाळ हा भारताचा मित्र असल्याने सर्व सीमा खुली आहे.

भारताचा शेजारी देश नेपाळच्या समाजकंटकांनी भारतीय सीमेमध्ये घुसून वनविभागावर हल्ले केले आहेत. धर्मापूर रेंजच्या पाच चौक्यांना आग लावण्यात आली आहे. 

धर्मापूरच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली असून उद्या वनविभागाचे कार्यालय उघडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. 

नोव्हेंबरमध्ये नेपाळी नागरिकांनी शीसम या लाकडाची दोन झाडे तोडली होती. तेव्हा १० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोणीही सापडला नव्हता. शनिवारी धर्मापूर रेंजच्या वन क्षेत्राधिकाऱ्यांनी एका संशयित नेपाळी नागरिकाला ताब्यात घेतले होते. त्याला रात्री सोडून देण्यात आले होते. मात्र, याचा राग आलेल्या नेपाळी नागरिकांनी काही चौक्यांना आगी लावल्या, असे कतर्नियाघाटचे वनाधिकारी बी शिव शंकर यांनी सांगितले. 

कतर्नियाघाट जंगलाचा ४५ किमीचा पट्टा नेपाळच्या सीमेला लागून आहे. तर पूर्ण बहराइच जंगल ७० किमीच्या सीमेवर आहे. नेपाळ हा भारताचा मित्र असल्याने सर्व सीमा खुली आहे. यामुळे या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. या लोकांना रोखण्यासाठी कतर्नियाघाटच्या सीमावर्ती भागात सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या १६ चौक्या बनविण्यात आल्या आहेत. तर पूर्ण सीमेवर २३ चौक्या आहेत. तरीही नेपाळी भारतीय सीमेत घुसून वनविभागाच्या चौक्यांना आगी लावत आहेत. चौक्यांना आग लावल्यामुळे या उष्णतेच्या दिवसांत जंगलाला आग लागण्याची शक्यता होती. 

टॅग्स :Nepalनेपाळfireआगforest departmentवनविभाग