शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:31 IST

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलुज नदीतून पाकिस्तानी नाव हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती.

ठळक मुद्देपंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलुज नदीतून पाकिस्तानी नाव हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. पण अचानक कार्यक्रम रद्द करावा लागला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा विमानतळावर माघारी परतत असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ताफा अडवला आणि मोठा गहजब उडाला. आंदोलक शेतकऱ्यांच्या व्यत्ययामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास २० मिनिटं एका उड्डाणपुलावरच थांबून होता. विशेष म्हणजे या ठिकाणापासून पाकिस्तानची बॉर्डर केवळ 10 किमीवर होती, असे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदरसिंग यांनी म्हटलं होता. आता, याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलज नदीतून पाकिस्तानी नाव (होडी) हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती. या नावेत कोण बसलं होतं, कोण प्रवास करत होतं, याचा तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जेथून ही पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. तेथूनच सतलुज नदी पाकिस्तानातून भारतात प्रवेश करते. अनेकदा येथूनच तस्करी करणाऱ्यांना अमली पदार्थांसह पकडण्यात आले आहे. तर, या प्रदेशात पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात येते. फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील प्रदेश आहे. 

10 किमी अंतरावर पाकिस्तानी बॉर्डर

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झालेल्या सुरक्षेच्या गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंजाबचा कायदा व सुव्यवस्था फोल झाल्याचेही अरमिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या सीमारेषेपासून केवळ 10 किमी अंतरावरील मार्गावर आपण पंतप्रधानांसाठी सुरक्षित मार्ग देऊ शकत नाहीत. मग, आपणास पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे अरमिंदरसिंग यांनी म्हटलंय. 

काँग्रेस नेत्यांना केलं जातंय लक्ष्य

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत राज्य सरकारने केलेल्या निष्काळजपणामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेतेही या सुरक्षा यंत्रणांवरुन काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. राजधानी दिल्लीत आज राजघाट येथे भाजपा खासदारांनी मौन धरणे आंदोलन केले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भातील चुकीमुळे पंजाब सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबPakistanपाकिस्तानriverनदी