शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

धक्कादायक! पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला लागली गळती, मुख्य पुजाऱ्यांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 17:58 IST

Ram Mandir Ayodhya: कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येमधील राम जन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. अयोध्येतील भव्य राम मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज अयोध्येत येत असतात. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.

रामललांचे प्रमुख पुजारी आचार्च सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या  गर्भगृहाच्या छतामधून काही दिवसांपूर्वी पाण्याची गळती होत होती. त्यानंतर दुरुस्तीचं काम करून ही गळती बंद करण्यात आली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसामध्ये मंदिरात पुजाऱ्यांचं बसण्याचं ठिकाण आणि व्हीआयपी दर्शनासाठी जिथे लोक येतात, त्याठिकाणी पावसाचं पाणी गळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. 

रामललांचे मुख्य पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडण्यात आलं होतं. मात्र मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात रामललांच्या मंदिरातील छताला गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती धक्कादायक आहे. राम मंदिराच्या बांधकामामध्ये काही हलगर्जी झाल्याचं दिसत आहे. रात्री पाऊस पडला. तसेच सकाळी पुजारी जेव्हा पूजेसाठी मंदिरात गेले, तेव्हा तिथे पाणी भरलेलेल दिसून आले. खूप प्रयत्न करून हे पाणी मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहितीही त्यांनी दिली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याRainपाऊस