शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

धक्कादायक! भारतात होतात रोज ३,६00 बालविवाह!मानवी आयोगाने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:41 IST

भारतात रोज होत असलेल्या सुमारे ३,६०० बालविवाहांची गंभीर नोंद घेत, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्यांना ही सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी अत्यंत कठोर धोरण अवलंबून २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

भुवनेश्वर - भारतात रोज होत असलेल्या सुमारे ३,६०० बालविवाहांची गंभीर नोंद घेत, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्यांना ही सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी अत्यंत कठोर धोरण अवलंबून २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.आयोगाचे सरचिटणीस अंबुज शर्मा यांनी गुरुवारी बालविवाहावरील विभागीय परिषदेत सांगितले की, १८ वर्षांखालील मुलांचे विवाह ही राष्ट्रीय समस्या बनत चालली आहे. ते थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कृती योजना तयार करणे हा या परिषदेचा हेतू आहे. कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना संबंधित संस्थांपुढे असलेली आव्हाने आणि बालविवाहांचा शोध लावणे व त्याची नोंद करण्यासाठी निकष तयार करण्यावरही चर्चा होईल.जगात होणाºया बालविवाहांपैकी ४० टक्के भारतात होतात. रोज ३,६०० असे विवाह लागतात, असे आयोगाने नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या (एनसीआरबी) हवाल्याने निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षात मोजक्याच बालविवाहांची नोंद होते.सन २०१५ आणि २०१६ मध्ये अनुक्रमे २९३ व ३२६ बाल विवाहांची नोंद बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये झाल्याची एनसीआरबीकडे नोंद आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी-४ च्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये झालेल्या एकूण विवाहांपैकी ४०.७ विवाह अल्पवयीनांचे होते. बिहारमध्ये ३९.१, झारखंडमध्ये ३८ तर ३५.४ टक्के राजस्थानात बालविवाह लागले.बालविवाहांचे प्रमाण केरळ, पंजाबमध्ये कमीदहा वर्षांपूर्वी पंजाब व केरळमध्ये बालविवाहांचे प्रमाण अनुक्रमे ६१.४२ व ५०.६५ टक्के होते.7.6%पंजाब व केरळ63.5% गोड्डा (झारखंड)58.8%गरव्हा (झारखंड)57.2% भिलवाडा (राजस्थान)58.8% मालदा (प. बंगाल) 

टॅग्स :Indiaभारत