शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

#SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:44 IST

गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देमाणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत.मात्र कर्नाटकात घडलेली ही घटना तर त्या सरळ्या घटनांवर कहरच म्हणावी लागेल.त्या हत्तीच्या पिल्लाचा आगीने भाजून वेदनेत मृत्यू झाला मात्र नागरिक आपल्याच धुंदीत मश्गुल होते.

कर्नाटक : माणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. कर्नाटकमधूनही एक घटना समोर आली आहे ती म्हणजे गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने आणि माणसांच्या भितीमुळे या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा - आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

दि इंडिया फिडने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या कुरुबाराहूंडी या गावात अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप आला होता. हत्तींनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचं वनाधिकाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हत्तींना हुसकावण्यासाठी आगीचे गोळे फेकले जातात. तसंच, या गावातील लोकांनीही हत्तींना बाहेर काढण्यासाठी आगींचे गोळे फेकले. घाबरलेल्या हत्तीचे कळप यामुळे मागे फिरले. पण कळपातलं एक पिल्लू मात्र तिथेच राहिलं. पिल्लू एकटं असल्याचं पाहून गावकरी त्या पिल्लाजवळ पोहोचले. हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईकडे पोहोचवण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले. आपलं पिल्लू मागे राहिलंय हे कळताच हत्तीची आई पुन्हा गावात आली. पण माणसांची गर्दी पाहता तिला पुढे येता आलं नाही. परिणामी हत्तीची आई पुन्हा माघारी फिरली. आगीचे गोळे फेकल्याने पिल्लू जखमी झालं होतं, त्यात इतर गावकरी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. शिवाय आई पुन्हा गावात आल्याचं पाहूनही त्या पिल्लाला तिच्यासोबत पाठवावंसं त्यांना वाटलं नाही. 

आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हा सगळा प्रकार वनाधिकाऱ्यांना कळला तेव्हा त्यांनी तातडीने जखमी पिल्लाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच पिल्लाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या पिल्लाला आपल्या आईचा विरह सहन न झाल्याने त्याचे प्राण गेले आणि या मृत्यूला तिच माणसं कारण ठरली. एका बाजूने आपण वन्यप्राण्यांची जागा हिसकावून घेत आहोत. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. मानवी वस्तीत त्यांना मारच सहन करावा लागतो. शिवाय माणसांमधली भूतदया लोप पावत असल्याने मुक्या जनावरांचा हकनाक बळी जातोय.

टॅग्स :Karnatakकर्नाटकIndiaभारतSelfieसेल्फी