शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

#SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:44 IST

गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देमाणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत.मात्र कर्नाटकात घडलेली ही घटना तर त्या सरळ्या घटनांवर कहरच म्हणावी लागेल.त्या हत्तीच्या पिल्लाचा आगीने भाजून वेदनेत मृत्यू झाला मात्र नागरिक आपल्याच धुंदीत मश्गुल होते.

कर्नाटक : माणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. कर्नाटकमधूनही एक घटना समोर आली आहे ती म्हणजे गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने आणि माणसांच्या भितीमुळे या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा - आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

दि इंडिया फिडने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या कुरुबाराहूंडी या गावात अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप आला होता. हत्तींनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचं वनाधिकाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हत्तींना हुसकावण्यासाठी आगीचे गोळे फेकले जातात. तसंच, या गावातील लोकांनीही हत्तींना बाहेर काढण्यासाठी आगींचे गोळे फेकले. घाबरलेल्या हत्तीचे कळप यामुळे मागे फिरले. पण कळपातलं एक पिल्लू मात्र तिथेच राहिलं. पिल्लू एकटं असल्याचं पाहून गावकरी त्या पिल्लाजवळ पोहोचले. हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईकडे पोहोचवण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले. आपलं पिल्लू मागे राहिलंय हे कळताच हत्तीची आई पुन्हा गावात आली. पण माणसांची गर्दी पाहता तिला पुढे येता आलं नाही. परिणामी हत्तीची आई पुन्हा माघारी फिरली. आगीचे गोळे फेकल्याने पिल्लू जखमी झालं होतं, त्यात इतर गावकरी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. शिवाय आई पुन्हा गावात आल्याचं पाहूनही त्या पिल्लाला तिच्यासोबत पाठवावंसं त्यांना वाटलं नाही. 

आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हा सगळा प्रकार वनाधिकाऱ्यांना कळला तेव्हा त्यांनी तातडीने जखमी पिल्लाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच पिल्लाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या पिल्लाला आपल्या आईचा विरह सहन न झाल्याने त्याचे प्राण गेले आणि या मृत्यूला तिच माणसं कारण ठरली. एका बाजूने आपण वन्यप्राण्यांची जागा हिसकावून घेत आहोत. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. मानवी वस्तीत त्यांना मारच सहन करावा लागतो. शिवाय माणसांमधली भूतदया लोप पावत असल्याने मुक्या जनावरांचा हकनाक बळी जातोय.

टॅग्स :Karnatakकर्नाटकIndiaभारतSelfieसेल्फी