शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

#SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:44 IST

गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देमाणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत.मात्र कर्नाटकात घडलेली ही घटना तर त्या सरळ्या घटनांवर कहरच म्हणावी लागेल.त्या हत्तीच्या पिल्लाचा आगीने भाजून वेदनेत मृत्यू झाला मात्र नागरिक आपल्याच धुंदीत मश्गुल होते.

कर्नाटक : माणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. कर्नाटकमधूनही एक घटना समोर आली आहे ती म्हणजे गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने आणि माणसांच्या भितीमुळे या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा - आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

दि इंडिया फिडने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या कुरुबाराहूंडी या गावात अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप आला होता. हत्तींनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचं वनाधिकाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हत्तींना हुसकावण्यासाठी आगीचे गोळे फेकले जातात. तसंच, या गावातील लोकांनीही हत्तींना बाहेर काढण्यासाठी आगींचे गोळे फेकले. घाबरलेल्या हत्तीचे कळप यामुळे मागे फिरले. पण कळपातलं एक पिल्लू मात्र तिथेच राहिलं. पिल्लू एकटं असल्याचं पाहून गावकरी त्या पिल्लाजवळ पोहोचले. हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईकडे पोहोचवण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले. आपलं पिल्लू मागे राहिलंय हे कळताच हत्तीची आई पुन्हा गावात आली. पण माणसांची गर्दी पाहता तिला पुढे येता आलं नाही. परिणामी हत्तीची आई पुन्हा माघारी फिरली. आगीचे गोळे फेकल्याने पिल्लू जखमी झालं होतं, त्यात इतर गावकरी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. शिवाय आई पुन्हा गावात आल्याचं पाहूनही त्या पिल्लाला तिच्यासोबत पाठवावंसं त्यांना वाटलं नाही. 

आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हा सगळा प्रकार वनाधिकाऱ्यांना कळला तेव्हा त्यांनी तातडीने जखमी पिल्लाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच पिल्लाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या पिल्लाला आपल्या आईचा विरह सहन न झाल्याने त्याचे प्राण गेले आणि या मृत्यूला तिच माणसं कारण ठरली. एका बाजूने आपण वन्यप्राण्यांची जागा हिसकावून घेत आहोत. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. मानवी वस्तीत त्यांना मारच सहन करावा लागतो. शिवाय माणसांमधली भूतदया लोप पावत असल्याने मुक्या जनावरांचा हकनाक बळी जातोय.

टॅग्स :Karnatakकर्नाटकIndiaभारतSelfieसेल्फी