शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

#SHOCKING : सेल्फीच्या नादात गेला हत्तीच्या पिल्लाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:44 IST

गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देमाणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत.मात्र कर्नाटकात घडलेली ही घटना तर त्या सरळ्या घटनांवर कहरच म्हणावी लागेल.त्या हत्तीच्या पिल्लाचा आगीने भाजून वेदनेत मृत्यू झाला मात्र नागरिक आपल्याच धुंदीत मश्गुल होते.

कर्नाटक : माणसांमधली माणुसकी कमी होत जात असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. कर्नाटकमधूनही एक घटना समोर आली आहे ती म्हणजे गावकऱ्यांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला त्याच्या आईपासून तोडलं. परिणामी आईच्या विरहाने आणि माणसांच्या भितीमुळे या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा - आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

दि इंडिया फिडने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या कुरुबाराहूंडी या गावात अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप आला होता. हत्तींनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचं वनाधिकाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हत्तींना हुसकावण्यासाठी आगीचे गोळे फेकले जातात. तसंच, या गावातील लोकांनीही हत्तींना बाहेर काढण्यासाठी आगींचे गोळे फेकले. घाबरलेल्या हत्तीचे कळप यामुळे मागे फिरले. पण कळपातलं एक पिल्लू मात्र तिथेच राहिलं. पिल्लू एकटं असल्याचं पाहून गावकरी त्या पिल्लाजवळ पोहोचले. हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईकडे पोहोचवण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले. आपलं पिल्लू मागे राहिलंय हे कळताच हत्तीची आई पुन्हा गावात आली. पण माणसांची गर्दी पाहता तिला पुढे येता आलं नाही. परिणामी हत्तीची आई पुन्हा माघारी फिरली. आगीचे गोळे फेकल्याने पिल्लू जखमी झालं होतं, त्यात इतर गावकरी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. शिवाय आई पुन्हा गावात आल्याचं पाहूनही त्या पिल्लाला तिच्यासोबत पाठवावंसं त्यांना वाटलं नाही. 

आणखी वाचा - आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हा सगळा प्रकार वनाधिकाऱ्यांना कळला तेव्हा त्यांनी तातडीने जखमी पिल्लाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच पिल्लाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या पिल्लाला आपल्या आईचा विरह सहन न झाल्याने त्याचे प्राण गेले आणि या मृत्यूला तिच माणसं कारण ठरली. एका बाजूने आपण वन्यप्राण्यांची जागा हिसकावून घेत आहोत. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. मानवी वस्तीत त्यांना मारच सहन करावा लागतो. शिवाय माणसांमधली भूतदया लोप पावत असल्याने मुक्या जनावरांचा हकनाक बळी जातोय.

टॅग्स :Karnatakकर्नाटकIndiaभारतSelfieसेल्फी