शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

धक्कादायक! माजी जवानाला बांगलादेशातील घुसखोर ठरवून आसाम पोलिसांनी पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 15:30 IST

आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली मोहम्मद अजमल हक हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. मात्र आज त्यांना भारताचे नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागतो आहे. तुम्ही बांगलादेशी घुसखोर नाही, तर भारतीयच आहात, हे सिद्ध करा, असं हक यांना नोटिशीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

गुवाहाटी - आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे. मोहम्मद अजमल हक हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. मात्र आज त्यांना भारताचे नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागतो आहे.आसाम पोलिसांनी हक यांना बांगलादेशी घुसखोर ठरवत नोटीस बजावून भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं आहे. अनेक वर्षं लष्करात ज्युनिअर ऑफिसर म्हणून काम करून ते निवृत्त झाले. मोहम्मद अजमल हक हे गुवाहाटीला वास्तव्याला आहेत. परंतु गेल्या महिन्यात पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीमुळे ते हैराण झाले. पोलिसांनी त्या नोटिशीत त्यांनी भारताचं नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं होतं. तुम्ही बांगलादेशी घुसखोर नाही, तर भारतीयच आहात, हे सिद्ध करा, असं हक यांना नोटिशीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.आसाममध्ये बाहेरून म्हणजे खास करून बांगलादेशातून आलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी 100 फॉरनर्स ट्रीब्यूनल्सची स्थापना केली आहे. हक यांना मिळालेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, तुमच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी केस दाखल केली आहे. तुम्ही 25 मार्च 1971नंतर भारतात कोणत्याही कारणाशिवाय घुसखोरी केली आहे. 25 मार्च 1971 रोजीच पाकिस्तानच्या सेनेनं पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशातील लोकांविरोधात ऑपरेशन सर्चलाइट सुरू केलं होतं. हक यांना बजावलेल्या नोटिशीत 11 सप्टेंबरला न्यायालयासमोर येऊन स्वतःची नागरिकता सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे. परंतु हक यांना ही नोटीसच 11 सप्टेंबरनंतर मिळाली आहे. कारण ही नोटीस त्यांचं गाव कालाहीकशला पाठवण्यात आली होती. कालाहीकश हे गुवाहाटीहून 70 किलोमीटर दूर आहे. आता 13 ऑक्टोबरला हक न्यायाधिकरणासमोर उपस्थित राहणार आहेत. हक हे 1986मध्ये टेक्निशियन म्हणून भारतीय लष्करात भरती झाले होते. विशेष म्हणजे 2012 रोजी हक यांची पत्नी मुमताज बेगम यांना नोटीस पाठवून नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं.