शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 11:32 IST

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील चार लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चूल पेटवून झोपल्यानंतर गुदमरून या चौघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. उत्तर दिल्लीतील खेडा परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या हाडे गोठवणारी थंडी असल्याने प्रत्येकजण थंडीपासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे. खेडा परिसरातील एका कुटुंबाने घरात उब निर्माण व्हावी, यासाठी झोपण्याआधी चूल पेटवून ठेवली. मात्र या चुलीचा रात्री प्रचंड धूर झाला आणि सकाळी हे कुटुंब मृतावस्थेत आढळले. 

मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. मुलांचे वय ७ वर्ष आणि ८ वर्ष इतके होते. थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रात्रभर चूल पेटवून ठेवून गुदमरून मृत्यू झाल्याची दिल्लीतील ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीही एका तरुणाचा अशाच प्रकार मृत्यू झाला होता. रात्रभर चूल पेटवून ठेवल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरातून कार्बन मोनो-ऑक्साइडसारखा विषारी वायू बाहेर पडतो. त्यामुळे जीव जाण्याचा धोका निर्माण होत असल्याने याबाबतची खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीweatherहवामान