शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 11:32 IST

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील चार लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चूल पेटवून झोपल्यानंतर गुदमरून या चौघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. उत्तर दिल्लीतील खेडा परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या हाडे गोठवणारी थंडी असल्याने प्रत्येकजण थंडीपासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे. खेडा परिसरातील एका कुटुंबाने घरात उब निर्माण व्हावी, यासाठी झोपण्याआधी चूल पेटवून ठेवली. मात्र या चुलीचा रात्री प्रचंड धूर झाला आणि सकाळी हे कुटुंब मृतावस्थेत आढळले. 

मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. मुलांचे वय ७ वर्ष आणि ८ वर्ष इतके होते. थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रात्रभर चूल पेटवून ठेवून गुदमरून मृत्यू झाल्याची दिल्लीतील ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीही एका तरुणाचा अशाच प्रकार मृत्यू झाला होता. रात्रभर चूल पेटवून ठेवल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरातून कार्बन मोनो-ऑक्साइडसारखा विषारी वायू बाहेर पडतो. त्यामुळे जीव जाण्याचा धोका निर्माण होत असल्याने याबाबतची खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीweatherहवामान