शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

सेना ‘एनडीए’तून बाहेर; ३ दशकांचे नाते संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 06:19 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या भाजप व शिवसेनेचे नाते तब्बल ३० वर्षांनी संपुष्टात आले आहे.

- सुरेश भुसारी नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या भाजप व शिवसेनेचे नाते तब्बल ३० वर्षांनी संपुष्टात आले आहे. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचा सर्वात जुना सहकारी एनडीएतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती केली होती. प्रमोद महाजन या युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जात. ही युती ३० वर्षांनी मात्र संपुष्टातआली.१९९८, १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना होती. दिल्लीत अकाली दल व शिवसेना हे दोनच पक्ष कायम भाजपसोबत राहिले होते. इतर पक्ष भाजपप्रणीत एनडीएतून आत-बाहेर होत राहिले; परंतु कोणत्याहीक्षणी शिवसेनेने कधीच भाजपची साथ सोडली नव्हती. सध्या शिवसेनेचे लोकसभेत १८ व राज्यसभेत ३ सदस्य आहेत. शिवसेनेच्या या निर्णयाने दिल्लीतील केंद्र सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही; परंतु पुढील राजकीय स्थितीमध्ये मात्र भाजपला शिवसेनेची उणीव भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.>अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामामहाराष्ट्रात भाजप व शिवसेना यांच्यातील युती मोडीत निघाल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.'मी राजीनामा दिला आहे, त्यातून तुम्हीच अर्थ काढा', असे सूचक वक्तव्य त्यांनी नंतर केले. अरविंद सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा पाठवला. सावंत सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याचे नमूद करून सावंत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेचे समान वाटप, या मुद्यावर चर्चा झाली होती. परंतु भाजप नेते आता नाकारत आहेत.अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. शिवसैनिक म्हणून माझ्यासाठी हे अत्यंत वेदनादायी आहे. अशा राजकीय स्थितीत केंद्रात मंत्री राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याने मी पदाचा राजीनामा दिला आहे.अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारल्याचे अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची जराही शक्यता नसल्याने सावंत यांच्या खात्याचा कारभार इतर मंत्र्याकडे सोपवण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.>राममंदिरावर शिक्कामोर्तब होताच तुटली युतीरामजन्मभूमीच्या मुद्यावर शिवसेना-भाजप एकत्र आले. राज्यात १९९५ साली युतीचे सरकारही स्थापन झाले. अयोध्येत राममंदिर उभारण्यावर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र युती संपली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस