शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"तेज प्रताप यांची RJD मधून हकालपट्टी, स्वतंत्र संघटना केली स्थापन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 22:18 IST

shivanand tiwari : बिहारमधील पोटनिवडणुकीसंदर्भात महाआघाडीमधील दरी वाढत असल्याचे दिसते.

हाजीपूर : राष्ट्रीय जनता दल (RJD) मध्येही सर्व काही ठीक नाही. पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी तेज प्रताप यादव आरजेडीमध्ये नसल्याचा दावा केला आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, तेज प्रताप यादव यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह कंदील वापरण्याची परवानगी नाही, असा दावाही शिवानंद तिवारी केला. (shivanand tiwari claims tej pratap yadav is not in rjd he is expelled from the party)

पक्षामध्ये तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यातील गदारोळाच्या प्रश्नावर शिवानंद तिवारी यांनी धक्कादायक खुलासा केला. दोन भावांमधील वादाच्या प्रश्नावर शिवानंद तिवारी म्हणाले की, तेज प्रताप यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच, तेज प्रताप यादव यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह कंदील वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे, म्हणजेच लालू प्रसाद यादव यांच्यानंतर आरजेडीमधील पक्षाचा वारसा पूर्णपणे तेजस्वी यांना देण्यात आला आहे, असेही शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, आरजेडी पक्षाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी म्हणाले की, तेजप्रताप पक्षात कुठे आहेत? त्यांनी एक नवीन संघटनाही स्थापन केली आहे. ते आरजेडीमध्ये नाहीत. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांची आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेत कंदील चिन्ह लावले होते, त्यामुळे पक्षाने त्यांना सांगितले की, कंदील लावता येणार नाही. याबाबत त्यांनी स्वतः कबूल केले की, आपल्याला नकार देण्यात आला आहे. हा संदेश स्पष्ट आहे.

दरम्यान, बिहारमधील पोटनिवडणुकीसंदर्भात महाआघाडीमधील दरी वाढत असल्याचे दिसते. आरजेडीने दोन्ही जागांवर उमेदवार उभे करण्याच्या घोषणेवर काँग्रेस नाराज आहे, त्यामुळे आता आरजेडी एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेसला डिवचताना दिसत आहे. हाजीपूरला पोहोचलेल्या शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसला टोला हाणला आणि म्हटले की, विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने 70 जागा लढवल्या होत्या, पण काय झाले?

आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी म्हटले की, काँग्रेसच्या जिद्दीमुळे उत्तर प्रदेशात भाजपा जिंकला आणि अखिलेश यादव पराभूत झाले. जर काँग्रेसला बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालसारख्या राज्यात ड्रायव्हिंग सीट हव्या असतील, तर आरजेडीसारखे प्रादेशिक पक्ष कुठे जातील, असे सवालही शिवानंद तिवारी यांनी केला.

दरम्यान, अशा परिस्थितीत, आरजेडी पोटनिवडणुकीत कोणत्याही किंमतीत काँग्रेससाठी जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर, आरजेडीने येत्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला आपल्या समीकरणांनुसार त्यांच्या भूमिकेत बसवण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार