शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पाचवीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अवमान, शिवसंघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 11:14 IST

शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

अमरावती - उत्तर प्रदेशातील मधुबन प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेल्या इयत्ता पाचवीच्या हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी मधुबन प्रकाशन आणि लेखिका डॉ. अनुराधा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही मराठा संघटनांनी केली आहे. 

हिंदी भाषेतील व्याकरण वाटिका-5 या पुस्तकातील 'रचनात्मक गतविधिया' या धड्यातील परिच्छेद चार आणि पाचमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक बाजारात आणि ऑनलाईन स्वरुपात उपबल्ध आहे. त्यामुळे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडने यावर आक्षेप घेत लेखिका आणि प्रकाशकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. याबाबत सचिन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटा आणि अवमानकारक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. शिवरायांची ओळख धाडसी, पराक्रमी आणि शूरवीर अशी आहे. मात्र, लेखिकेने जाणूनबुजून त्यांच्याविषयी लेखिकेने चुकीच्या आणि आकसपूर्ण मनोवृत्तीने हे लिखाण केल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. दरम्यान, हे पुस्तक इंटरनेटवरुन हटविण्यात यावे. तसेच शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करु नये अशी मागणीही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजUttar Pradeshउत्तर प्रदेश