शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पाचवीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अवमान, शिवसंघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 11:14 IST

शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

अमरावती - उत्तर प्रदेशातील मधुबन प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेल्या इयत्ता पाचवीच्या हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी मधुबन प्रकाशन आणि लेखिका डॉ. अनुराधा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही मराठा संघटनांनी केली आहे. 

हिंदी भाषेतील व्याकरण वाटिका-5 या पुस्तकातील 'रचनात्मक गतविधिया' या धड्यातील परिच्छेद चार आणि पाचमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक बाजारात आणि ऑनलाईन स्वरुपात उपबल्ध आहे. त्यामुळे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडने यावर आक्षेप घेत लेखिका आणि प्रकाशकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. याबाबत सचिन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटा आणि अवमानकारक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. शिवरायांची ओळख धाडसी, पराक्रमी आणि शूरवीर अशी आहे. मात्र, लेखिकेने जाणूनबुजून त्यांच्याविषयी लेखिकेने चुकीच्या आणि आकसपूर्ण मनोवृत्तीने हे लिखाण केल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. दरम्यान, हे पुस्तक इंटरनेटवरुन हटविण्यात यावे. तसेच शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करु नये अशी मागणीही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजUttar Pradeshउत्तर प्रदेश