शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राष्ट्रवादीला आठ खासदारांवर होती ३ मंत्रीपदे; शिवसेना १८ जागा जिंकूनही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 11:29 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेने आपली कामगिरी कायम ठेवत १८ जागा जिंकल्या. मात्र मंत्रीपदाच्या बाबतीत, शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अनेक अशा घडामोडी घडल्या, ज्यामुळे 'युद्धात जिंकले पण तहात हारले' ही म्हण अस्तित्वात आली. महाराष्ट्रातील राजकीय नेते दिल्लीतील नेतृत्वासमोर अनेकदा हतबल होताना दिसले आहेत. मात्र २००९ मध्ये शरद पवारांच्या मुत्सद्दीपणामुळे युपीए २ मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ आठ खासदारांच्या संख्याबळावर तीन मंत्रीपदे मिळाली होती. परंतु, स्पष्ट बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला राष्ट्रवादीच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकूनही मंत्रीपदांच्या बाबतीत निराशा हाती आली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला शानदार विजय मिळाला. एनडीएने ३५० हून अधिक जागांवर विजय मिळवला. यामध्ये एकट्या भाजपने ३०२ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेने आपली कामगिरी कायम ठेवत १८ जागा जिंकल्या. मात्र मंत्रीपदाच्या बाबतीत, शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात गुरुवारी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेची एकाच मंत्रीपदावर बोळवण झाल्याचे बोलले जात आहे. तर एकही खासदार नसताना एक मंत्रीपद मिळवणारे रामदास आठवले भारी भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या बरोबरीने महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला केवळ एकच मंत्रीपद आले आहे. तर भाजपचे पाच आणि रिपाईला एक असे सात मंत्रीपदं महाराष्ट्राला मिळाली आहे. २०१४ मध्ये देखील शिवसेनेला केंद्रात फारसा वाव मिळाला नव्हता. शिवसेनेला मिळालेल्या एका मंत्रीपदामुळे २००९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मुत्सद्दीपणांची चर्चा सध्या रंगत आहे.

२००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण ८ जागा मिळाल्या होत्या. या आठ जागांच्या जोरावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात तीन मंत्रीपदी पाडून घेतली होती. यामध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश होता. शरद पवार यांच्याकडे महत्त्वपूर्ण असे कृषीमंत्रीपद होते. शिवसेनेचा विचार केल्यास आज शिवसेनेला केवळ एक मंत्रीपद मिळाले आहे. तर महाआघाडीत असलेल्या रामदास आठवले यांना मंत्रीपद मिळाले आहे. मोदींच्या नवीन मंत्रीमंडळात एनडीएतील सर्व घटकपक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद दिले आहे. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनाईटेडने मंत्रीमंडळात येण्यास नकार दिल्याने त्यांचा एकही प्रतिनिधी मंत्रीमंडळात नाही.