शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई”; एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:33 IST

संजय राऊतांचा दावा चुकीचा आहे. गुवाहाटीतील सगळे आमदार स्वेच्छेने आणि मर्जीने आलेले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

गुवाहाटी: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर तीव्र शब्दांत टीका केली. यानंतर आता, सरकारचा रडीचा डाव सुरू झाला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने सुरक्षा काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. चुकीच्या माहितींवर विश्वास ठेऊ नका. आम्ही गट करतोय, ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही. योग्य माहिती तुम्हाला दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

सगळे आमदार स्वेच्छेने आणि मर्जीने आलेले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १० आमदारांनी फोनवरून सांगितले की, आम्हाला तुमच्यासोबत यायचंय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर बोलताना, इथे असलेले आमदार स्वेच्छेने आणि आपल्या मर्जीने आलेले आहे. महाविकास आघाडीतील सरकामध्ये आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांनी हा निर्णय स्वतःहून घेतलेला आहे. शेवटी प्रत्येक आमदार २ ते ४ लाख लोकांमधून निवडून येत असतात. ते याबाबत अनभिज्ञ नसतात. त्यांना यातील काही कळत नाही, असे होत नाही. ते सूज्ञ आहेत, त्यांना लाखो लोकांनी निवडून दिलेले आहे. या निर्णयाबाबत त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलेले आहे. एवढेच नव्हे, तर प्रतिज्ञापत्र दिले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहेत, असे एकनाथ शिंदे स्पष्टपणे सांगितले.

हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई सुरु

मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य ठिकाणी असलेल्या या आमदारांच्या कार्यालयावर तोडफोड सुरू करण्यात आली आहे. यावर बोलातना, या मालमत्तेचे तसेच जीविताचे रक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे, असे शिंदे यांनी ठणकावले. तसेच आमदारांच्या कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारकडून काढली जात असल्याचे सांगितले जात आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना, हा रडीचा डाव सुरू झाला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने ही अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी