शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

“हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई”; एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:33 IST

संजय राऊतांचा दावा चुकीचा आहे. गुवाहाटीतील सगळे आमदार स्वेच्छेने आणि मर्जीने आलेले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

गुवाहाटी: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर तीव्र शब्दांत टीका केली. यानंतर आता, सरकारचा रडीचा डाव सुरू झाला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने सुरक्षा काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. चुकीच्या माहितींवर विश्वास ठेऊ नका. आम्ही गट करतोय, ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही. योग्य माहिती तुम्हाला दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

सगळे आमदार स्वेच्छेने आणि मर्जीने आलेले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १० आमदारांनी फोनवरून सांगितले की, आम्हाला तुमच्यासोबत यायचंय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर बोलताना, इथे असलेले आमदार स्वेच्छेने आणि आपल्या मर्जीने आलेले आहे. महाविकास आघाडीतील सरकामध्ये आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांनी हा निर्णय स्वतःहून घेतलेला आहे. शेवटी प्रत्येक आमदार २ ते ४ लाख लोकांमधून निवडून येत असतात. ते याबाबत अनभिज्ञ नसतात. त्यांना यातील काही कळत नाही, असे होत नाही. ते सूज्ञ आहेत, त्यांना लाखो लोकांनी निवडून दिलेले आहे. या निर्णयाबाबत त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलेले आहे. एवढेच नव्हे, तर प्रतिज्ञापत्र दिले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहेत, असे एकनाथ शिंदे स्पष्टपणे सांगितले.

हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई सुरु

मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य ठिकाणी असलेल्या या आमदारांच्या कार्यालयावर तोडफोड सुरू करण्यात आली आहे. यावर बोलातना, या मालमत्तेचे तसेच जीविताचे रक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे, असे शिंदे यांनी ठणकावले. तसेच आमदारांच्या कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारकडून काढली जात असल्याचे सांगितले जात आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना, हा रडीचा डाव सुरू झाला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने ही अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी