शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“शरद पवारांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”; बंडखोर आमदार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:24 IST

उद्धव ठाकरे यांनी मविआमधून बाहेर पडावे आणि भाजप युतीच्या सरकार स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, असे बंडखोर आमदारांनी म्हटले आहे.

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयाने १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आहोत, जो काही निर्णय ते घेतील, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही लवकरच महाराष्ट्रात येणार आहोत. मुंबईत कधी यायचे, याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत. आमच्याकडे मेजोरिटी आहे, आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केला. 

एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आणि यापुढेही तेच राहतील

एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आणि यापुढेही तेच राहतील. शिवसेनेकडून जी भूमिका घेतेय, त्यात त्यांचेच नुकसान जास्त आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे आम्ही म्हटलेले नाही. त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ उद्धव ठाकरे यांनी सोडावी, असे आवाहन करत, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. एक लिगसी या पक्षाची आहे. मातोश्रीवर कुणीही आरोप करू नयेत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

शरद पवारांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री असते, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीतील सल्लागार अधिक महत्त्वाचे आणि जवळचे वाटतात. जनमताच्या कौलाप्रमाणे शिवसेना-भाजपचे सरकार यायला हवे. शिवसेनेत अवघे १० ते १२ आमदार उरलेत. भाजपने जनमताच्या कौलाचा आदर केला, ते काही रस्त्यावर उतरले नाहीत. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अजूनही आदरच आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून युतीचे सरकार स्थापन करण्याची विनंती केली आहे. अन्यथा आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे. तसेच भाजपसोबत जायचे की नाही, ते एकनाथ शिंदे ठरवतील, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार