शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सोनिया गांधींच्या अटीमुळेच ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 06:36 IST

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून शिवसेना बाहेर पडली, तरच त्या पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा विचार करू,

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून शिवसेना बाहेर पडली, तरच त्या पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा विचार करू, या सोनिया गांधी यांच्या अटीमुळेच अरविंद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा इथे सुरू आहे.महाराष्ट्रातील शिवसेना व भाजप यांची युती आधीच मोडीत निघाली होती; पण केंद्रातील एनडीएमध्ये शिवसेनेचा सहभाग होता आणि अरविंद सावंत मोदी सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री होते. त्यांचा राजीनामा हा शिवसेनेचे एनडीएशी संबंध तुटल्याचेच द्योतक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची अलीकडेच भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. त्यावेळीच सोनिया गांधी यांनी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, त्यानंतर पाठिंब्यावर विचार करता येईल, असे पवार यांना सांगितले होते. पवार यांनी ही बाब शिवसेना नेते संजय राऊत यांना सांगितली. त्यानंतरच अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास शिवसेनेने सांगितले. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतरही काँग्रेसने लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली नाही.>सोनिया गांधींना दिली माहितीकाँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे नेते सकाळीच दिल्लीत दाखल झाले. अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर व अनिल देसाई यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. आता आम्ही राज्यात युतीतून आणि दिल्लीत एनडीएतून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. त्यामुळे काँग्रेसने आता आम्हाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विंनती सेना नेत्यांनी अहमद पटेल यांना केली. त्यानंतर अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊ न त्यांना या चर्चेची माहिती दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी