शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:21 IST

जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - राहुल शेवाळे यांनी जे आरोप केलेत तो हलकटपणा, नीचपणा आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशाप्रकारे उभे केले शेवटी ते त्यांच्यावर उलटलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक यंत्रणांनी केला. सुशांत राजपूतची आत्महत्या हे स्पष्ट केले. ज्यांच्यावर बलात्कार, विनयभंगाचे आरोप आहेत. जे कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होते ते आदित्य ठाकरेंवर आरोप करतायेत ते किती वैफल्यग्रस्त झालेत हे दिसून येते अशाप्रकारे खासदार संजय राऊत यांनी राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात सरकारवर विशेषत: मुख्यमंत्र्यांवर भूखंड वाटपाचे जे आरोप सुरू आहेत. त्याला तोंड देताना सरकारची पळापळ आणि धावपळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी कुणी असे आरोप करत असतील तर ते भ्रमात आहे. हे सरकार भ्रष्ट मार्गाने बनलं आणि भ्रष्ट मार्गानेच ते पडेल. आमच्यावर किती आरोप केलेत. तुरुंगात पाठवले तरी शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाहीत. मागे हटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच जे हा खेळ खेळतायेत त्यांचे राज्य औटघटकेचे आहे. या सगळ्यांना पश्चाताप होईल. बिहार पोलीस कोण? महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का? सीबीआयनं क्लीनचीट दिल्यावर बिहार पोलिसांचे काय घेऊन बसलात. मुळात हे प्रकरण ज्यांनी काढले त्यांनी स्वत:ला पाहावं. संसदेत विषय काय होता आणि मुद्दा काय उकरून काढला. हे घाणेरडे प्रयोग केले जातायेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. अशा खूप फाईली निघू शकतात. घरातल्या सुद्धा. फाईलींची लढाई सुरू झाली तर सगळ्यांना महागात पडेल असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला. 

दरम्यान, जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात. पक्षाने पदे दिली म्हणून अनेकजण मोठे झाले. हकालपट्टी करेपर्यंत तुम्हाला नावं माहिती नव्हती. मंत्री निघून गेले संपर्कप्रमुखाचं काय घेऊन बसलेत. पक्षातून काही बाजूला झाले असतील तर त्यांचा निकाल निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात लागेल. प्रत्येक पक्षात माणसं येत जात असतात. पक्ष कधी संपत नसतो. काही स्वार्थी, बेईमान लोक निघून जातात. जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार? २०२४ ला जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल असंही संजय राऊतांनी बजावलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे