शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:21 IST

जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - राहुल शेवाळे यांनी जे आरोप केलेत तो हलकटपणा, नीचपणा आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशाप्रकारे उभे केले शेवटी ते त्यांच्यावर उलटलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक यंत्रणांनी केला. सुशांत राजपूतची आत्महत्या हे स्पष्ट केले. ज्यांच्यावर बलात्कार, विनयभंगाचे आरोप आहेत. जे कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होते ते आदित्य ठाकरेंवर आरोप करतायेत ते किती वैफल्यग्रस्त झालेत हे दिसून येते अशाप्रकारे खासदार संजय राऊत यांनी राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात सरकारवर विशेषत: मुख्यमंत्र्यांवर भूखंड वाटपाचे जे आरोप सुरू आहेत. त्याला तोंड देताना सरकारची पळापळ आणि धावपळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी कुणी असे आरोप करत असतील तर ते भ्रमात आहे. हे सरकार भ्रष्ट मार्गाने बनलं आणि भ्रष्ट मार्गानेच ते पडेल. आमच्यावर किती आरोप केलेत. तुरुंगात पाठवले तरी शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाहीत. मागे हटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच जे हा खेळ खेळतायेत त्यांचे राज्य औटघटकेचे आहे. या सगळ्यांना पश्चाताप होईल. बिहार पोलीस कोण? महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का? सीबीआयनं क्लीनचीट दिल्यावर बिहार पोलिसांचे काय घेऊन बसलात. मुळात हे प्रकरण ज्यांनी काढले त्यांनी स्वत:ला पाहावं. संसदेत विषय काय होता आणि मुद्दा काय उकरून काढला. हे घाणेरडे प्रयोग केले जातायेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. अशा खूप फाईली निघू शकतात. घरातल्या सुद्धा. फाईलींची लढाई सुरू झाली तर सगळ्यांना महागात पडेल असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला. 

दरम्यान, जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात. पक्षाने पदे दिली म्हणून अनेकजण मोठे झाले. हकालपट्टी करेपर्यंत तुम्हाला नावं माहिती नव्हती. मंत्री निघून गेले संपर्कप्रमुखाचं काय घेऊन बसलेत. पक्षातून काही बाजूला झाले असतील तर त्यांचा निकाल निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात लागेल. प्रत्येक पक्षात माणसं येत जात असतात. पक्ष कधी संपत नसतो. काही स्वार्थी, बेईमान लोक निघून जातात. जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार? २०२४ ला जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल असंही संजय राऊतांनी बजावलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे