शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:21 IST

जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - राहुल शेवाळे यांनी जे आरोप केलेत तो हलकटपणा, नीचपणा आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशाप्रकारे उभे केले शेवटी ते त्यांच्यावर उलटलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक यंत्रणांनी केला. सुशांत राजपूतची आत्महत्या हे स्पष्ट केले. ज्यांच्यावर बलात्कार, विनयभंगाचे आरोप आहेत. जे कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होते ते आदित्य ठाकरेंवर आरोप करतायेत ते किती वैफल्यग्रस्त झालेत हे दिसून येते अशाप्रकारे खासदार संजय राऊत यांनी राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात सरकारवर विशेषत: मुख्यमंत्र्यांवर भूखंड वाटपाचे जे आरोप सुरू आहेत. त्याला तोंड देताना सरकारची पळापळ आणि धावपळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी कुणी असे आरोप करत असतील तर ते भ्रमात आहे. हे सरकार भ्रष्ट मार्गाने बनलं आणि भ्रष्ट मार्गानेच ते पडेल. आमच्यावर किती आरोप केलेत. तुरुंगात पाठवले तरी शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाहीत. मागे हटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच जे हा खेळ खेळतायेत त्यांचे राज्य औटघटकेचे आहे. या सगळ्यांना पश्चाताप होईल. बिहार पोलीस कोण? महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का? सीबीआयनं क्लीनचीट दिल्यावर बिहार पोलिसांचे काय घेऊन बसलात. मुळात हे प्रकरण ज्यांनी काढले त्यांनी स्वत:ला पाहावं. संसदेत विषय काय होता आणि मुद्दा काय उकरून काढला. हे घाणेरडे प्रयोग केले जातायेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. अशा खूप फाईली निघू शकतात. घरातल्या सुद्धा. फाईलींची लढाई सुरू झाली तर सगळ्यांना महागात पडेल असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला. 

दरम्यान, जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात. पक्षाने पदे दिली म्हणून अनेकजण मोठे झाले. हकालपट्टी करेपर्यंत तुम्हाला नावं माहिती नव्हती. मंत्री निघून गेले संपर्कप्रमुखाचं काय घेऊन बसलेत. पक्षातून काही बाजूला झाले असतील तर त्यांचा निकाल निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात लागेल. प्रत्येक पक्षात माणसं येत जात असतात. पक्ष कधी संपत नसतो. काही स्वार्थी, बेईमान लोक निघून जातात. जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार? २०२४ ला जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल असंही संजय राऊतांनी बजावलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे