शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही, शिंदेंचा दिल्लीतून पटलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 09:15 IST

बाळासाहेबांचे विचारांची जोपासणा करण्यासाठी आपण वेगळे  झाल्याचे सांगून ते म्हणाले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट यांच्या विचारांवर आणि शिवसैनिकांच्या रक्तातून उभा राहिलेला झालेला पक्ष आहे. हा कुणा एका कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही, अशा शब्दात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्ला चढविला. शिवसेनेच्या देशातील १३ राज्यांमधील राज्यप्रमुखांची सभा बुधवारी दिल्लीत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड शब्दात उत्तरे दिली. 

बाळासाहेबांचे विचारांची जोपासणा करण्यासाठी आपण वेगळे  झाल्याचे सांगून ते म्हणाले, बाळासाहेबांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचे महापाप कधीही केले नाही. हे महापाप आता झाले आहे. हा हिंदुत्वाचा निखारा विझू नये, यासाठी आम्ही वेगळे झालो आहे. सत्तेसाठी वेगळे झालो नाही. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. ही प्रतारणा कुठेतरी मला व माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना खुपत होती. परंतु मनातील ही बाब शिवसैनिकांची ऐकून घेतली जात नव्हती. ते सर्वजण माझ्याकडे येत होते. माझ्याकडे दु:ख सांगत होते. त्यामुळे हा निर्णय घेतला. सत्तेसाठी हा निर्णय घेतला नाही. सत्ता असलेल्या  लोकांनी मंत्रिपदाच्या खुर्चीवर लाथ मारून माझ्यासोबत आले आहेत. हे विचारांशी बांधिलकी होती म्हणून झाले आहे.

होय, कंत्राटदार मुख्यमंत्रीमाझ्यावर कंत्राटदार मुख्यमंत्री असल्याचा आरोप केला जात आहे. होय, मी बेरोजगारांना रोजगार देण्याचे कंत्राट घेतले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कंत्राट घेतले आहे. वृद्धांना मदत करण्याचे कंत्राट घेतले आहे. यासाठी मला कुणी कंत्राटदार म्हणत असतील तर ते माझ्यासाठी भूषणावह आहे.

दाऊदचा हस्तक नाहीमाझ्यावर मोदी व शहाचा हस्तक असल्याचा आरोप केला जातो. परंतु मी आयुष्यात दाऊदचा हस्तक राहिलो नाही. मी राममंदिर बांधणाऱ्यांना सहकार्य केले आहे, असेही ते म्हणाले. 

पब्लिक है सब जानती हैखोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी सांगायला सुरूवात केली तर तुम्ही कुठे राहणार आहे. पब्लिक है सब जानती है, असे म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर हल्ला चढविला.

विचार, पक्ष विकणारी टोळी?उद्धव ठाकरे यांनी बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय, असा घणाघात केला होता. याबाबत शिंदे म्हणाले, आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येत आहे. शिवसैनिकांवर विश्वास नाही, म्हणून प्रतिज्ञापत्र घेतले जात आहेत. अडीच वर्षांनी गटप्रमुखांना अच्छे दिन आले, असा टोलाही टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीShiv Senaशिवसेना