शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पाच हजार मते

By admin | Updated: February 11, 2015 02:06 IST

दिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीदिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली. तर केंद्रात मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची चांगलीच दांडी उडाली. शिवसेनेने २२ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज बाद ठरले. उर्वरित १९ उमेदवारांना एकत्रितपणे ४ हजार ९०६ मते मिळाली. तर आठवले यांच्या चार उमेदवारांना १४९ मते मिळाली. राजौरी गार्डन नावाच्या व्यापारी व श्रीमंत लोकांच्या वस्तीत शिवसेनेच्या उमेदवाराने चौथ्या क्रमांकाची मते मिळविली. उरलेल्या १८ जागांवर शिवसेनेला नामुश्कीच पत्कारावी लागली. काँग्रेसचे प्रचारप्रमुख अजय माकन यांच्या विरोधात उमेदवाराला उतरवून पहिले दोन दिवस शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली, मात्र नंतर उमेदवार कोण हेही कुणाच्या ध्यानात नव्हते. त्या उमेदवारास अवघी २५७ मते मिळाली. १९ मधील पाच उमेदवारांना ५०च्या आतील मते मिळाली. पाच जण १००पर्यंत पोहोचले. चार जणांनी दीडशेपर्यंत मते घेतली. नरेला, सुल्तानपूर, मगोलपुरी, बुराडी, पटपडगंज या संमिश्र वस्तीत चारशेच्या आसपास धावा काढल्या. मराठी माणसांच्या करोलबाग, जनकपुरी वस्तीत शिवसेनेला ५० वर मते मिळालेली नाहीत. शिवसेनेचे दिल्लीप्रमुख ओमदत्त शर्मा यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी कसे वाऱ्यावर सोडले ते सांगून एकही उमेदवार विजयी होणार नाही किंवा स्पर्धेतही असणार नाही, असे निवडणुकीपूर्वीच सांगून टाकले होते.