शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिवसेनेला पाच हजार मते

By admin | Updated: February 11, 2015 02:06 IST

दिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीदिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली. तर केंद्रात मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची चांगलीच दांडी उडाली. शिवसेनेने २२ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज बाद ठरले. उर्वरित १९ उमेदवारांना एकत्रितपणे ४ हजार ९०६ मते मिळाली. तर आठवले यांच्या चार उमेदवारांना १४९ मते मिळाली. राजौरी गार्डन नावाच्या व्यापारी व श्रीमंत लोकांच्या वस्तीत शिवसेनेच्या उमेदवाराने चौथ्या क्रमांकाची मते मिळविली. उरलेल्या १८ जागांवर शिवसेनेला नामुश्कीच पत्कारावी लागली. काँग्रेसचे प्रचारप्रमुख अजय माकन यांच्या विरोधात उमेदवाराला उतरवून पहिले दोन दिवस शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली, मात्र नंतर उमेदवार कोण हेही कुणाच्या ध्यानात नव्हते. त्या उमेदवारास अवघी २५७ मते मिळाली. १९ मधील पाच उमेदवारांना ५०च्या आतील मते मिळाली. पाच जण १००पर्यंत पोहोचले. चार जणांनी दीडशेपर्यंत मते घेतली. नरेला, सुल्तानपूर, मगोलपुरी, बुराडी, पटपडगंज या संमिश्र वस्तीत चारशेच्या आसपास धावा काढल्या. मराठी माणसांच्या करोलबाग, जनकपुरी वस्तीत शिवसेनेला ५० वर मते मिळालेली नाहीत. शिवसेनेचे दिल्लीप्रमुख ओमदत्त शर्मा यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी कसे वाऱ्यावर सोडले ते सांगून एकही उमेदवार विजयी होणार नाही किंवा स्पर्धेतही असणार नाही, असे निवडणुकीपूर्वीच सांगून टाकले होते.