शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

शिवसेनेला पाच हजार मते

By admin | Updated: February 11, 2015 02:06 IST

दिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीदिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली. तर केंद्रात मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची चांगलीच दांडी उडाली. शिवसेनेने २२ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज बाद ठरले. उर्वरित १९ उमेदवारांना एकत्रितपणे ४ हजार ९०६ मते मिळाली. तर आठवले यांच्या चार उमेदवारांना १४९ मते मिळाली. राजौरी गार्डन नावाच्या व्यापारी व श्रीमंत लोकांच्या वस्तीत शिवसेनेच्या उमेदवाराने चौथ्या क्रमांकाची मते मिळविली. उरलेल्या १८ जागांवर शिवसेनेला नामुश्कीच पत्कारावी लागली. काँग्रेसचे प्रचारप्रमुख अजय माकन यांच्या विरोधात उमेदवाराला उतरवून पहिले दोन दिवस शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली, मात्र नंतर उमेदवार कोण हेही कुणाच्या ध्यानात नव्हते. त्या उमेदवारास अवघी २५७ मते मिळाली. १९ मधील पाच उमेदवारांना ५०च्या आतील मते मिळाली. पाच जण १००पर्यंत पोहोचले. चार जणांनी दीडशेपर्यंत मते घेतली. नरेला, सुल्तानपूर, मगोलपुरी, बुराडी, पटपडगंज या संमिश्र वस्तीत चारशेच्या आसपास धावा काढल्या. मराठी माणसांच्या करोलबाग, जनकपुरी वस्तीत शिवसेनेला ५० वर मते मिळालेली नाहीत. शिवसेनेचे दिल्लीप्रमुख ओमदत्त शर्मा यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी कसे वाऱ्यावर सोडले ते सांगून एकही उमेदवार विजयी होणार नाही किंवा स्पर्धेतही असणार नाही, असे निवडणुकीपूर्वीच सांगून टाकले होते.