शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदे गट खरी शिवसेना नसून 'ज्युनिअर भाजपा'; १२ तारखेनंतर सरकार कोसळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:11 IST

दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल असं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

 नवी दिल्ली - सुशील मोदी ना घरचे ना घाटचे. ते शिवसेनेवर टीका करतात ते हास्यास्पद. भाजपा केवळ विरोधी पक्षांवर नाही तर सोबत असणाऱ्या पक्षांनाही संपवण्याचा घाट घालतं. सत्तेच्या नादात भाजपा मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतं. शिवसेनेला मराठी माणसाने बनवली आहे. कुणीही शिवसेना संपवू शकत नाही. जे टीका टिप्पणी करतात त्यांनी शिवसेना काय आहे ते समजून घ्यावं नाहीतर राज्यात त्यांचे हसू होईल अशा शब्दात खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, शिवसेना एकच आहे. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. भाजपासोबत जे आहेत ती ज्युनिअर भाजपा आहे. त्यांनी कितीही म्हटलं खरी शिवसेना आम्ही तरीही शिवसैनिक, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. संविधान त्यांना त्यांची जागा दाखवेल असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. 

तसेच शरद पवार म्हणाले तेच खरे आहे. दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल. शिंदे गटाने छोटा भाजपा, मोठा भाजपा यात अंतर ठेवू नये. एकच भाजपा बनवावी. शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण असावं हे शिवसैनिक ठरवतील ४० आमदार ठरवू शकत नाही. त्यांना वेगळा पक्ष काढावा लागेल. वेगळे चिन्ह घ्यावे लागेल असंही खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. 

दरम्यान, जर कुणावर आरोप लागले असतील तर चौकशी व्हायला हवी. संजय राठोड यांच्यावर आरोप होते म्हणून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. मग भाजपाने ज्यांच्यावर आरोप लावले त्यांनाच मंत्री बनवले ही नैतिकता आहे का? आता महाराष्ट्र सरकारचं महत्त्वाचे खातेही राठोडांना द्यावं. १२ तारखेच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत विचारला असतं हे सरकार पडणार असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. 

बाळासाहेब ठाकरेंचं नाव का नाही घेतलं? बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? ठाकरे घराण्याने तुम्हाला सगळं दिलं. त्यांनी एखादवेळेस पद घेतले त्याचा आनंद व्हायला हवा होता. अडीच वर्ष सहन करू शकला नाहीत. तुमच्या ईडीच्या कारवाया, खोटं बोलायचं. गैरव्यवहार त्यातून काढलेली पळवाट आहे अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा