शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शिलाँगमधील हिंसक घटनांनंतर मेघालय सरकार स्थापन करणार समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:34 IST

शिलाँगमधील सफाई कामगार वस्तीमधील महिला आणि शिलाँग सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. या सर्व भांडणाचे पर्यवसान मोठ्या तणावात होऊन दोन समुदाय एकमेकांच्या समोर उभे राहाण्यापर्यंत शिलाँगमधील परिस्थिती बिघडली होती.

शिलांग- दोन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या प्रसंगानंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी एक उच्चस्तरिय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिलाँगमधील सफाई कामगार वस्तीमधील महिला आणि शिलाँग सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. या सर्व भांडणाचे पर्यवसान मोठ्या तणावात होऊन दोन समुदाय एकमेकांच्या समोर उभे राहण्यापर्यंत शिलाँगमधील परिस्थिती बिघडली होती.शिलाँग येथिल लेव मानलोंग  ही वस्ती दुसरीकडे वसवण्याच्या जुन्या योजनेबाबत कायमचा तोडगा काढण्य़ासाठी सरकराने ही समिती स्थापन केली आहे. उपमुख्यमंत्री प्रिस्टोन त्यांनसोंग या समितीचे प्रमुख असतील. त्यांच्यासह गृहमंत्री जेम्स के. संगमा, नागरविकास मंत्री हॅम्लेट्सन डोहलिंग, आरोग्य आणि कुटुंबनियोजन मंत्री अलेक्झांडर एल. हेक, कृषीमंत्री बान्टेइडोर लिंगडोह, खासी हिल्स अॅटोनॉमस डिस्ट्रीक्ट कौन्सीलचे मुख्य कार्यकारी सदस्य प्यान्शेंगेन एन सायेमही या समितीचे सदस्य असतील.मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले, नगरविकास मंत्रालयाला या विषयाबाबत एक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सफाई कामगारांची वस्ती, तिचा इतिहास, कायदेशीर बाबी, अनधिकृतरित्या राहाणारे लोक याबाबतची माहिती मागवलेली आहे. लवकरात लवकर माहिती सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिलाँगमध्ये निदर्शने करणाऱ्या लोकांना शांततेचे आवाहन केले असून त्यांचे आंदोलन थांबविण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. या आंदोलनाचा रोजंदारी करमारे कामगार, शेतकरी, टॅक्सीचालक, किरकोळ विक्री करणारे लोक, दुकानदार यांच्या कमाईवर परिणाम होत असल्याचीही जाणिव त्यांनी आंदोलकांना करुन दिली.

टॅग्स :north eastईशान्य भारत