शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:19 IST

एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक आणि अनोखं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. तिने पहिल्या पतीला थेट आव्हान देत गावात परत येण्याची घोषणा केली आहे.

'ब्रेकअपच्या खोट्या अफवा, आता बघते काय करतोस?'पुतण्या सचिनसोबत लग्न केलेल्या आयुषीने एका व्हिडीओमध्ये पती विशालवर गंभीर आरोप केले आहेत. “माझा सचिनसोबत ब्रेकअप झाला आहे अशा खोट्या अफवा माझा पहिला पती पसरवत आहे. आता मी जमुईला येऊन त्याच पतीच्या समोर माझ्या नव्या नवऱ्यासोबत (पुतण्या) राहीन. बघते कोण आम्हाला थांबवतोय आणि तो काय बिघडवतो,” असं आयुषीने म्हटलं आहे.

यावर आयुषी पुढे म्हणाली, “मी विशालकडे परत जाणार नाही. आता त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माझ्या आयुष्यातून देवानेच विशालला बाहेर काढलंय, मग मी का त्याच्याकडे परत जाऊ? विशालच्या त्रासाला कंटाळूनच मी दुसरं लग्न केलं. विशाल इतका खाली उतरला आहे की त्याला देवही माफ करणार नाही. लोकांना वाटतंय की मी विशालसोबत राहीन, पण मी लवकरच गावात परत येऊन त्यांना दाखवून देईन की मी माझ्या पती सचिनच्या घरी राहीन.”

कसं सुरू झालं होतं प्रेमप्रकरण?आयुषीचं पहिलं लग्न २०२१ मध्ये विशाल दुबेसोबत झालं होतं. त्यांना ४ वर्षांची एक मुलगीही आहे. पण लग्नानंतर २ वर्षांनी आयुषीची जवळची ओळख तिचा नातेवाईक आणि शेजारी असलेल्या सचिन दुबेसोबत वाढली. १५ जून रोजी आयुषी तिचा पती आणि मुलीला सोडून सचिनसोबत घरातून पळून गेली. यानंतर विशालने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर दोन्ही प्रेमी समोर आले आणि २० जून रोजी त्यांनी गावातील एका शिवमंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.

'जाऊ दिलं नसतं तर जीवच घेतला असता'विशालने आयुषीच्या या निर्णयावर कोणतीही हरकत घेतली नाही. त्याने सांगितलं, “ज्याला मी लहानपणापासून वाढवलं, तोच पुतण्या माझ्या बायकोला घेऊन गेला. दोन वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. कळल्यावर मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही ऐकलं नाही. जर मी तिला जाऊ दिलं नसतं, तर तिने माझा जीवच घेतला असता. माझी मुलगी खूप समजूतदार आहे. ती आता आईची आठवण काढत नाही. माझी आई आणि मी मिळून तिला सांभाळत आहोत. आता तीच माझ्या आयुष्याचा आधार आहे. मी दुसरं लग्न करणार नाही, कारण लग्नाच्या नावावरच मला आता तिरस्कार वाटतो.”

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी