शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:19 IST

एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक आणि अनोखं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. तिने पहिल्या पतीला थेट आव्हान देत गावात परत येण्याची घोषणा केली आहे.

'ब्रेकअपच्या खोट्या अफवा, आता बघते काय करतोस?'पुतण्या सचिनसोबत लग्न केलेल्या आयुषीने एका व्हिडीओमध्ये पती विशालवर गंभीर आरोप केले आहेत. “माझा सचिनसोबत ब्रेकअप झाला आहे अशा खोट्या अफवा माझा पहिला पती पसरवत आहे. आता मी जमुईला येऊन त्याच पतीच्या समोर माझ्या नव्या नवऱ्यासोबत (पुतण्या) राहीन. बघते कोण आम्हाला थांबवतोय आणि तो काय बिघडवतो,” असं आयुषीने म्हटलं आहे.

यावर आयुषी पुढे म्हणाली, “मी विशालकडे परत जाणार नाही. आता त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माझ्या आयुष्यातून देवानेच विशालला बाहेर काढलंय, मग मी का त्याच्याकडे परत जाऊ? विशालच्या त्रासाला कंटाळूनच मी दुसरं लग्न केलं. विशाल इतका खाली उतरला आहे की त्याला देवही माफ करणार नाही. लोकांना वाटतंय की मी विशालसोबत राहीन, पण मी लवकरच गावात परत येऊन त्यांना दाखवून देईन की मी माझ्या पती सचिनच्या घरी राहीन.”

कसं सुरू झालं होतं प्रेमप्रकरण?आयुषीचं पहिलं लग्न २०२१ मध्ये विशाल दुबेसोबत झालं होतं. त्यांना ४ वर्षांची एक मुलगीही आहे. पण लग्नानंतर २ वर्षांनी आयुषीची जवळची ओळख तिचा नातेवाईक आणि शेजारी असलेल्या सचिन दुबेसोबत वाढली. १५ जून रोजी आयुषी तिचा पती आणि मुलीला सोडून सचिनसोबत घरातून पळून गेली. यानंतर विशालने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर दोन्ही प्रेमी समोर आले आणि २० जून रोजी त्यांनी गावातील एका शिवमंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.

'जाऊ दिलं नसतं तर जीवच घेतला असता'विशालने आयुषीच्या या निर्णयावर कोणतीही हरकत घेतली नाही. त्याने सांगितलं, “ज्याला मी लहानपणापासून वाढवलं, तोच पुतण्या माझ्या बायकोला घेऊन गेला. दोन वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. कळल्यावर मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही ऐकलं नाही. जर मी तिला जाऊ दिलं नसतं, तर तिने माझा जीवच घेतला असता. माझी मुलगी खूप समजूतदार आहे. ती आता आईची आठवण काढत नाही. माझी आई आणि मी मिळून तिला सांभाळत आहोत. आता तीच माझ्या आयुष्याचा आधार आहे. मी दुसरं लग्न करणार नाही, कारण लग्नाच्या नावावरच मला आता तिरस्कार वाटतो.”

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारBiharबिहारCrime Newsगुन्हेगारी