Shashi Tharoor on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'आत्मसमर्पणा'बाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केले आहे.
शशी थरुर काय म्हणाले?शशी थरुर सध्या अमेरिकेत संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. यादरम्यान त्यांना राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. यावर थरुर म्हणाले, "जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा वापरत राहतील, तोपर्यंत आम्ही बळाची भाषा वापरू. आम्ही अमेरिका आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा खूप आदर करतो. पण, आम्ही कोणालाही मध्यस्थी करायला सांगितले नाही. आम्हाला तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही," अशी प्रतिक्रिया थरुर यांनी दिली.
राहुल गांधी काय म्हणाले होते?ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचे श्रेय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचे स्पष्टपणे खंडन केले. पण, राहुल गांधींनी यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली युद्धविराम जाहीर दावाचा आरोप केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मसमर्पण करायला तयार झाले, अशी टीका राहुल गांधींनी केली. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा