शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पेगॅसस: संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी नाही: शशी थरूर; समिती करणार २८ जुलैला चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 06:34 IST

पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवल्याच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी होण्याची शक्यता काँग्रेस नेते शशी थरुर यांनी फेटाळून लावली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :  पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवल्याच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी होण्याची शक्यता काँग्रेस नेते शशी थरुर यांनी फेटाळून लावली. ते माहिती तंत्रज्ञान विषयाच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. पेगॅसस प्रकरणाचा विषय स्थायी समितीपुढे आला असून, ती आपले कर्तव्य चोखपणे बजावेल, असे शशी थरूर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पेगॅससप्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी संसदीय स्थायी समितीने २८ जुलैरोजी केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खाते, गृहखाते, दूरसंचार खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलाविले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची गरज नाही. आम्ही कोणावरही पाळत ठेवलेली नाही, असे केंद्र सरकार सांगत आहे. या प्रकरणात केंद्राची बाजू ऐकून घेणेही महत्त्वाचे आहे. मात्र अधिकृत निर्णयाद्वारे ही पाळत ठेवण्यात आली, असे केंद्र सरकार म्हणत असेल, तर त्या निर्णयामागची कारणे सरकारला समितीसमोर मांडावीच लागतील.

दुसऱ्या देशाचा हात असण्याचीही शक्यता

काँग्रेस नेते शशी थरुर म्हणाले की, पाळत कोणावर ठेवावी, याबद्दल सुस्पष्ट कायदे करण्यात आले आहेत. दहशतवाद किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी काही व्यक्तींवर पाळत ठेवता येऊ शकते. आपल्या सरकारने पेगॅससद्वारे पाळत ठेवली नसेल, तर हे कृत्य अन्य देशांच्या सरकारने केले असण्याचीही शक्यता आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदShashi Tharoorशशी थरूर