शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

‘शरीफ’ इमेज ‘खमकी’ होण्याची चिन्हे

By admin | Updated: May 26, 2014 03:10 IST

डिप्लोमॅटिक संबंधाची झुंज लावून देण्यात माध्यमांना रस असला तरी प्रत्यक्षात मात्र भारत-पाक संबंधाना या शपथविधीनंतर चांगले दिवस आले तर ते पाकिस्तानी जनतेलाही हवेच

मेघना ढोके, नाशिक - डिप्लोमॅटिक संबंधाची झुंज लावून देण्यात माध्यमांना रस असला तरी प्रत्यक्षात मात्र भारत-पाक संबंधाना या शपथविधीनंतर चांगले दिवस आले तर ते पाकिस्तानी जनतेलाही हवेच आहे, मोदींच्या नेतृत्वाविषयीची उत्सुकता सीमेपारही वाढताना दिसते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तमाम विरोध झुगारून घेतलेला भारतभेटीचा निर्णय त्यांची देशांतर्गत प्रतिमा तर उजळवेलच पण भारत-पाक व्यापारवृद्धीसाठीही या सकारात्मक कृतीचा उपयोग होईल अशी आशा पाकिस्तानी जनतेला वाटते आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याप्रमाणे डिप्लोमॅटिक वॉर कोण जिंकले आणि मोदींनी पाकसह नवाज शरीफ यांची कशी कोंडी केली याची समीकरणे मांडण्यात मशगूल आहे तशीच स्थिती पाकिस्तानी मीडियातही आहे. नवाज शरीफ यांनी भारताची ही ‘दावत’ स्वीकारून हिंदुत्ववादी मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणे बरे नव्हे असे काही पाकिस्तानी माध्यमं वारंवार म्हणत आहेत. त्यात पाकिस्तान आर्मीला ‘जवळची’ असलेली काही माध्यमं पाक सैन्याचा विरोध वारंवार अधोरेखित करत पाकिस्तानी अस्मितेची दळणे दळत आहेत. प्रत्यक्षात पाकिस्तानी जनता मात्र नवाज शरीफ यांच्या या खंबीर निर्णयाने आणि खमक्या कृतीने खूश आहे. पाकिस्तानातले ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार अमर गुरडो सांगतात, ‘भारताशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यापलीकडे पाकिस्तानकडे आजच्या घडीला तरी दुसरा काही पर्यायच नाही. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या आगीत होरपळतो आहे, विकास आणि महागाईच्या प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. त्यात अफगणिस्तानला कण्ट्रोल करत दहशतवाद्यांना वेसण घालण्याची पाकिस्तानची जुनी स्ट्रॅटेजीही आता सैन्याच्या हातात उरलेली नाही. देशांतर्गत प्रश्नांतून डोके वर काढणे शक्य नसताना भारताशी असलेल्या संबंधात अकारण तणाव शरीफ यांना परवडणारा नाही त्यामुळेच सैन्याचा विरोध न जुमानता पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. वाजपेयींना पाक भेटीचे निमंत्रण देऊन शरीफ यांनी अशीच ‘पहल’ पूर्वीही एकदा केली होती. पण त्या वेळी मुशर्रफ यांनी सैन्याचे बंड करून शरीफ यांनाच पदच्युत केले. या वेळेस परिस्थिती वेगळी आहे, लोकनियुक्त पाक सरकार पूर्वीपेक्षा जास्त खमके आहे आणि शरीफ ज्या पंजाब प्रांताचे आहेत त्या प्रांताचे भारत-पाक मैत्रीला मोठे पाठबळ मिळते आहे.’ या कृतीचा पाकिस्तानात काय ‘मेसेज’ जाईल याचा विचार करूनच नवाज शरीफ भारतभेटीवर निघत आहेत. त्यांना तातडीने भारत-पाक व्यापार वृद्धीत रस आहे. ते स्वत: व्यापारी वृत्तीचे आहेत त्यामुळे व्यापार वाढ आणि अर्थव्यवस्थेला गती ही त्यांच्यापुढची तातडीची उद्दिष्टे आहेत. त्यामुळेच ‘गुजराती’ मोदींच्या व्यापारी दृष्टिकोनाकडे तेही अधिक सकारात्मकतेने पाहत असावेत. भारत-पाक व्यापार वाघा-अटारी सीमेवरून सुरू झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानावर जबरदस्त पकड असलेल्या पंजाब प्रांताला होऊ शकतो. म्हणून पंजाब प्रांतात या भेटीविषयी उत्साह अधिक आहे अशी उकल करतानाच लाहोरच्या जंग वृत्तपत्रात कार्यरत वरिष्ठ पत्रकार शहजादा इरफान अहमद सांगतात, ‘लोकांना ‘बिझनेस’ हवा आहे, आर्थिक विकास हवा आहे आणि त्याचमुळे भारत-पाक व्यापारी संबंध अधिक सुकर व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे.