शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नेपाळची शारदा भारताच्या यमुनेला देणार जीवनदान, शेतीलाही येणार 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 12:33 IST

भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करार आता दिल्लीची तहान भागवणार आहे. नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडल्यानंतर दिल्लीतल्या लोकांना याचा फायदा पोहोचणार आहे.

नवी दिल्ली- भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करार आता दिल्लीची तहान भागवणार आहे. नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडल्यानंतर दिल्लीतल्या लोकांना याचा फायदा पोहोचणार आहे. तसेच देशातील प्रमुख पर्यावरण पर्यटन योजनेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच दिल्लीसह उत्तराखंडला ही या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.या योजनेमुळे डोंगराळ भागात वीज, पाणी आणि रोजगाराबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. या योजनेचा आराखडा(डीपीआर) तयार करण्यात आला असून, त्यावर दोन्ही देशांतील तज्ज्ञांची टीम अध्ययन करते आहे. दोन दशकांपूर्वी महाकाली पाणी कराराच्या माध्यमातून भारत व नेपाळने शारदा नदीवर पंचेश्वर बांध योजनेचं काम सुरू केलं होतं. परंतु या योजनेला खरी चालना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014च्या नेपाळ दौ-यानंतर मिळाली आहे.केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाशी संबंधित वॉटर अँड पॉवर कन्स्लटन्सी सर्व्हिसेज(वापकोस)ने हा डीपीआर बनवला आहे. आता याच्या अध्ययनासाठी 26 सदस्यांची एक टीमही बनवण्यात आली आहे. यात भारत आणि नेपाळमधील 18 सदस्यांचा समावेश आहे. या टीमच्या चार बैठक होणार असून, त्यानंतर दोन्ही देशांना या योजनेसंदर्भात अहवाल देण्यात येणार आहे. अतिरिक्त पाण्यानं स्वच्छ होणार यमुनाया योजनेचा फायदा जास्त करून नवी दिल्लीला होणार आहे. पंचेश्वर बांध तयार केल्यानंतर यमुना नदीला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. यमुनेच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीचं पाणी स्वच्छदेखील होणार आहे. त्यामुळे दिल्लीला स्वच्छ पाण्याचा पुरवठाही वाढणार आहे. ही योजना अस्तित्वात येण्यासाठी जवळपास 33108 कोटी रुपयांइतका खर्च होणार आहे. त्यातील 62.3 टक्के खर्च भारत देणार असून, उर्वरित खर्च नेपाळ करणार आहे. यामुळे 5050 मेगावॉट विजेचं उत्पादन होणार आहे. तसेच 4.3 हेक्टर क्षेत्रही ओलिताखाली येणार आहे. भारतातल्या जवळपास 2.6 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजना पूर्ण होणय्साठी 4592 कोटी रुपये दर वर्षाला खर्च आहे. यातील 3665 कोटी रुपयांचा विजेचा फायदा व 837 कोटी रुपयांच्या सिंचनाच्या क्षेत्राला फायदा होणार आहे. तसेच पूरग्रस्त भागालाही त्याचा फायदा होणार आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीNepalनेपाळ