शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जे काही झालं ते दुर्दैवी, शरद यादव यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 12:36 IST

आपण नितीश कुमार यांच्या निर्णयाशी असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्देवी होतं असं शरद यादव बोलले आहेत

ठळक मुद्दे'नितीश कुमार यांच्या निर्णयाशी असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्देवी'संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना शरद यादव यांनी आपलं मौन सोडत नितीश कुमारांवर हल्लाबोल केला

नवी दिल्ली, दि. 31 - नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद (यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी नितीश कुमारांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हल्लाबोल केला आहे. आपण नितीश कुमार यांच्या निर्णयाशी असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं असं शरद यादव बोलले आहेत. संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना शरद यादव यांनी आपलं मौन सोडत हे वक्तव्य केलं. 

'नितीश कुमार यांच्या निर्णयाशी आपण असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं. लोकांनी यासाठी आपल्याला मतं दिली नव्हती', असं शरद यादव बोलले आहेत. 

रविवारीदेखील शरद यादव यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेल्या भारतीयांपैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळेधन परत आणणार ही मोदींची मुख्य घोषणा होती. त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत झाल्याचे चित्र आहे. विविध सेवांच्या नावाखाली सरकार जनतेकडून विविध प्रकारचे सेस वसूल करीत आहे. या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झालेला नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे. केवळ खासगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला', असल्याची टीका त्यांनी ट्विटमधून केली होती.

बिहारमधील महाआघाडीतून जद(यु)ने तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून शरद यादव नितीशकुमारांवर नाराज असल्याची उघड चर्चा राजधानीत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीशकुमारांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर रविवारपर्यंत यादव गप्प होते. विशेषत: नितीशकुमारांच्या विरोधात एक शब्दही ते बोललेले नाहीत. शरद यादवांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून लालूप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे त्यांना आवाहन केले.

लालूप्रसाद यादव यांनीदेखील ट्विटवरुन आपलं मत मांडलं होतं. 'देशात गरीब, वंचित व शेतकरी वर्गावर संकट कोसळले आहे. या आपत्तीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जोरदार आंदोलन उभे करावे लागेल. देशाला पुन्हा एका नव्या संघर्षाची आता गरज आहे, शरदभाई त्यासाठी तुम्ही या. पूर्वीही आपण बरोबर संघर्ष केला आहे. लाठ्या खाल्ल्या आहेत. पुन्हा एकदा सारे मिळून या दक्षिणपंथी हुकुमशाहीला नेस्तनाबूत करू', असं लालूप्रसाद यादव बोलले होते.