शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करा, पवारांचे सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 16:52 IST

शरद पवार यांनी एक पत्रक जारी करुन जॉईंट स्टेटमेंट देत असल्याचं म्हटलयं. त्यामध्ये, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जॉईंट स्टेटमेंट जारी केलंय. त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारने स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे. या मागणीला प.बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनीही समर्थन दिलंय. 

शरद पवार यांनी एक पत्रक जारी करुन जॉईंट स्टेटमेंट देत असल्याचं म्हटलयं. त्यामध्ये, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, कम्युनिष्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, राज्यसभा खासदार मनोजकुमार झा, माजी मंत्री यशवंत सिन्हा, माजी मंत्री अरुण शौरी यांचे समर्थन आणि या सर्वांचे एकमत असल्याचे म्हटले आहे. विविधतेते एकता असलेला भारत देश असून देशाची राज्यघटना यावरच उभारली आहे. समता, बंधुता आणि अंखडता ही आपल्या संविधानाची मुल्ये आहेत. प्रत्येक नागरिकाला घटनेनं स्वतंत्र आणि मुक्तपणे जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची सुटका करावी, अशी मागणी या जाँईंट स्टेटद्वारे केली आहे. 

शरद पवार यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन हे जॉईंट स्टेटमेंट जारी केले आहे. त्यामध्ये, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची तात्काळ सुटका करावी, असे म्हटले आहे. तसेच, काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या राजकीय नेत्यांची सुटका करा, असेही त्यात म्हटले आहे.  

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली. तसेच महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सध्या, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांना सरकारने स्थानबद्ध केलं आहे. कलम 370 रद्द करणे आणि काश्मीरच्या विभाजनाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMumbaiमुंबईSharad Pawarशरद पवार