शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:26 IST

देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar On Operation Sindoor: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही, तर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले असं शरद पवार म्हणाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांमध्ये असलेल्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन सोहळे पार पडत आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला.  यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांसोबतच्या संबंधावर लक्ष वेधले. यावेळी पवार यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख न करता निशाणा साधला. ज्या बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला तोसुद्धा आपल्यासोबत नाही, असं शरद पवार म्हणाले.

"राष्ट्राच्या हितामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कधी राजकारण करणार नाही. पहलगाममध्ये काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्यामागे कोण आहे याची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांवर हल्ले होत असतील तर शासनाने कोणतीही भूमिका घेतली त्याचे समर्थन आम्ही करू. याच्यामध्ये राजकारण आणणार नाही असं सांगितलं. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायला हवा," असं शरद पवार यांनी म्हटलं.

"आज तुम्ही देशाचा नकाशा बघितला तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, शेजारी पाकिस्तान आहे. खाली गेलात की श्रीलंका आहे. सबंध देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण भारत यांच्यामध्ये सध्या काय स्थिती आहे. एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व आणि भारत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश असा या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानसोबत आपले संबंध चांगले नाहीत, चीनसोबत आपले संबंध चांगले नाहीत, बांगलादेश या देशासाठी भारताने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. श्रीलंकेबाबतही चिंता आहे. त्या ठिकाणी असलेला चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहेय सबंध देश आणि आपल्या शेजारचे देश यांच्यात सुसंवाद आहे अशी म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ हा आहे की देशाचे नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याची किंमत ही देशाला द्यावी लागते आहे," असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी