शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:26 IST

देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar On Operation Sindoor: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही, तर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले असं शरद पवार म्हणाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांमध्ये असलेल्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन सोहळे पार पडत आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला.  यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांसोबतच्या संबंधावर लक्ष वेधले. यावेळी पवार यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख न करता निशाणा साधला. ज्या बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला तोसुद्धा आपल्यासोबत नाही, असं शरद पवार म्हणाले.

"राष्ट्राच्या हितामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कधी राजकारण करणार नाही. पहलगाममध्ये काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्यामागे कोण आहे याची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांवर हल्ले होत असतील तर शासनाने कोणतीही भूमिका घेतली त्याचे समर्थन आम्ही करू. याच्यामध्ये राजकारण आणणार नाही असं सांगितलं. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायला हवा," असं शरद पवार यांनी म्हटलं.

"आज तुम्ही देशाचा नकाशा बघितला तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, शेजारी पाकिस्तान आहे. खाली गेलात की श्रीलंका आहे. सबंध देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण भारत यांच्यामध्ये सध्या काय स्थिती आहे. एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व आणि भारत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश असा या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानसोबत आपले संबंध चांगले नाहीत, चीनसोबत आपले संबंध चांगले नाहीत, बांगलादेश या देशासाठी भारताने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. श्रीलंकेबाबतही चिंता आहे. त्या ठिकाणी असलेला चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहेय सबंध देश आणि आपल्या शेजारचे देश यांच्यात सुसंवाद आहे अशी म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ हा आहे की देशाचे नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याची किंमत ही देशाला द्यावी लागते आहे," असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी