शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:26 IST

देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar On Operation Sindoor: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही, तर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले असं शरद पवार म्हणाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांमध्ये असलेल्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन सोहळे पार पडत आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला.  यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांसोबतच्या संबंधावर लक्ष वेधले. यावेळी पवार यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख न करता निशाणा साधला. ज्या बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला तोसुद्धा आपल्यासोबत नाही, असं शरद पवार म्हणाले.

"राष्ट्राच्या हितामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कधी राजकारण करणार नाही. पहलगाममध्ये काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्यामागे कोण आहे याची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांवर हल्ले होत असतील तर शासनाने कोणतीही भूमिका घेतली त्याचे समर्थन आम्ही करू. याच्यामध्ये राजकारण आणणार नाही असं सांगितलं. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायला हवा," असं शरद पवार यांनी म्हटलं.

"आज तुम्ही देशाचा नकाशा बघितला तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, शेजारी पाकिस्तान आहे. खाली गेलात की श्रीलंका आहे. सबंध देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण भारत यांच्यामध्ये सध्या काय स्थिती आहे. एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व आणि भारत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश असा या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानसोबत आपले संबंध चांगले नाहीत, चीनसोबत आपले संबंध चांगले नाहीत, बांगलादेश या देशासाठी भारताने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. श्रीलंकेबाबतही चिंता आहे. त्या ठिकाणी असलेला चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहेय सबंध देश आणि आपल्या शेजारचे देश यांच्यात सुसंवाद आहे अशी म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ हा आहे की देशाचे नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याची किंमत ही देशाला द्यावी लागते आहे," असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी