शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 19:36 IST

Oxygen Shortage: दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले.

ठळक मुद्देदिल्लीतील रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावरसरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावाकाही रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपला

नवी दिल्ली: देशभरात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही परिस्थिती बिकट आहे. अशातच दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले. (shanti mukund hospital in delhi faces oxygen shortage and ceo get emotional)

दिल्लीतील शांती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सागर यांनी ऑक्सिजनच्या बिकट परिस्थितीबाबत माहिती दिली. मात्र, यासंदर्भात बोलत असताना त्यांच्या मर्यादेचा बांध फुटला आणि अश्रू अनावर झाले. खूप बिकट स्थिती आहे. आमच्याकडे ऑक्सिजनचा खूप कमी साठा शिल्लक आहे. शक्य आहे त्यांना डिस्चार्ज देण्यास आम्ही डॉक्टरांना सांगितले आहे. आमच्याकडे फक्त २ तासांचाच ऑक्सिजन उरला आहे, असे सागर यांनी सांगितले.

सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा

सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी कळकळीची विनंती एका रुग्णाच्या मुलाने केली आहे.  दिल्लीतील शांती मुकुंद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास रुग्णांना डिस्चार्ज देणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांना बेड्ससाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अनेक रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

काही रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपला

राजधानीतील काही हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन पूर्णपणे संपला आहे. आता आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. काही राज्ये दिल्लीच्या वाट्याच्या ऑक्सिजनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. 

खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचे नाही, केंद्र सरकारचे धोरण जनतेविरोधातील आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली