शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 19:36 IST

Oxygen Shortage: दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले.

ठळक मुद्देदिल्लीतील रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावरसरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावाकाही रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपला

नवी दिल्ली: देशभरात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही परिस्थिती बिकट आहे. अशातच दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले. (shanti mukund hospital in delhi faces oxygen shortage and ceo get emotional)

दिल्लीतील शांती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सागर यांनी ऑक्सिजनच्या बिकट परिस्थितीबाबत माहिती दिली. मात्र, यासंदर्भात बोलत असताना त्यांच्या मर्यादेचा बांध फुटला आणि अश्रू अनावर झाले. खूप बिकट स्थिती आहे. आमच्याकडे ऑक्सिजनचा खूप कमी साठा शिल्लक आहे. शक्य आहे त्यांना डिस्चार्ज देण्यास आम्ही डॉक्टरांना सांगितले आहे. आमच्याकडे फक्त २ तासांचाच ऑक्सिजन उरला आहे, असे सागर यांनी सांगितले.

सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा

सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी कळकळीची विनंती एका रुग्णाच्या मुलाने केली आहे.  दिल्लीतील शांती मुकुंद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास रुग्णांना डिस्चार्ज देणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांना बेड्ससाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अनेक रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

काही रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपला

राजधानीतील काही हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन पूर्णपणे संपला आहे. आता आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. काही राज्ये दिल्लीच्या वाट्याच्या ऑक्सिजनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. 

खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचे नाही, केंद्र सरकारचे धोरण जनतेविरोधातील आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली