शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

राम मंदिराबाबत सूर बदलले, प्राणप्रतिष्ठापना, तिथीबाबत शंकराचार्य सदानंद सरस्वती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 23:58 IST

Ram Mandir: शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीचे सर्व विधी पूर्ण केले जाणार आहेत. दरम्यान, देशातील चारही मठांच्या शंकराचार्यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला विरोध केल्याने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले होते. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावरून सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.

शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेची ही तारीख सनातन धर्मासाठी शुभ लक्षण असल्याचे सांगितले. तसेच शंकराचार्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू असलं, या सोहळ्यासाठी निवडलेली तिथी आणि नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठापना होणं, यापैकी कशालाही विरोध केला नाही. मात्र काही कारणास्तव आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. 

राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार का? असं विचारलं असता शंकराचार्यांनी सांगितले की, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून आम्हाला निमंत्रण मिळालं आहे. तसेत या सोहळ्यामधून सनातन धर्माच्या अनुयायांची शेकडो वर्षांपूर्वीपासूनची इच्छा पूर्ण होत आहे. हा देशवासियांसाठी प्रसन्नतेचा विषय आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणं तर शक्य होणार नाही. मात्र आम्ही दर्शन घेण्यासाठी नक्कीच जाणार आहोत. हे काम खरंतर आधीच व्हायला हवं होतं. अखेर आता हा क्षण आला आहे. परमात्म्याला ज्याच्याकडून जे काम करवून घ्यायचं असेल त्याच्याकडून ते काम करून घेतो, असे शंकराचार्य म्हणाले. 

या पंतप्रधानांचं गर्भगृहात असणं शास्त्रानुसार आहे का, असं विचारलं असता त्यांनी सांगितले की, हा सोहळा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे. यावेळी देशात कुणाचंह सरकार असेल, त्या सरकारला या सोहळ्यामध्ये सहभागी करण्याची व्यवस्था करावी लागली असती. हे सरकारचं उत्तरदायित्व आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा निर्णय धर्मशास्त्रानुसारच घेतला असेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या