शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

राम मंदिराबाबत सूर बदलले, प्राणप्रतिष्ठापना, तिथीबाबत शंकराचार्य सदानंद सरस्वती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 23:58 IST

Ram Mandir: शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीचे सर्व विधी पूर्ण केले जाणार आहेत. दरम्यान, देशातील चारही मठांच्या शंकराचार्यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला विरोध केल्याने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले होते. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावरून सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.

शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेची ही तारीख सनातन धर्मासाठी शुभ लक्षण असल्याचे सांगितले. तसेच शंकराचार्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू असलं, या सोहळ्यासाठी निवडलेली तिथी आणि नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठापना होणं, यापैकी कशालाही विरोध केला नाही. मात्र काही कारणास्तव आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. 

राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार का? असं विचारलं असता शंकराचार्यांनी सांगितले की, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून आम्हाला निमंत्रण मिळालं आहे. तसेत या सोहळ्यामधून सनातन धर्माच्या अनुयायांची शेकडो वर्षांपूर्वीपासूनची इच्छा पूर्ण होत आहे. हा देशवासियांसाठी प्रसन्नतेचा विषय आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणं तर शक्य होणार नाही. मात्र आम्ही दर्शन घेण्यासाठी नक्कीच जाणार आहोत. हे काम खरंतर आधीच व्हायला हवं होतं. अखेर आता हा क्षण आला आहे. परमात्म्याला ज्याच्याकडून जे काम करवून घ्यायचं असेल त्याच्याकडून ते काम करून घेतो, असे शंकराचार्य म्हणाले. 

या पंतप्रधानांचं गर्भगृहात असणं शास्त्रानुसार आहे का, असं विचारलं असता त्यांनी सांगितले की, हा सोहळा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे. यावेळी देशात कुणाचंह सरकार असेल, त्या सरकारला या सोहळ्यामध्ये सहभागी करण्याची व्यवस्था करावी लागली असती. हे सरकारचं उत्तरदायित्व आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा निर्णय धर्मशास्त्रानुसारच घेतला असेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या