शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राम मंदिराबाबत सूर बदलले, प्राणप्रतिष्ठापना, तिथीबाबत शंकराचार्य सदानंद सरस्वती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 23:58 IST

Ram Mandir: शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीचे सर्व विधी पूर्ण केले जाणार आहेत. दरम्यान, देशातील चारही मठांच्या शंकराचार्यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला विरोध केल्याने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले होते. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावरून सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे.

शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेची ही तारीख सनातन धर्मासाठी शुभ लक्षण असल्याचे सांगितले. तसेच शंकराचार्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू असलं, या सोहळ्यासाठी निवडलेली तिथी आणि नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठापना होणं, यापैकी कशालाही विरोध केला नाही. मात्र काही कारणास्तव आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. 

राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार का? असं विचारलं असता शंकराचार्यांनी सांगितले की, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून आम्हाला निमंत्रण मिळालं आहे. तसेत या सोहळ्यामधून सनातन धर्माच्या अनुयायांची शेकडो वर्षांपूर्वीपासूनची इच्छा पूर्ण होत आहे. हा देशवासियांसाठी प्रसन्नतेचा विषय आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणं तर शक्य होणार नाही. मात्र आम्ही दर्शन घेण्यासाठी नक्कीच जाणार आहोत. हे काम खरंतर आधीच व्हायला हवं होतं. अखेर आता हा क्षण आला आहे. परमात्म्याला ज्याच्याकडून जे काम करवून घ्यायचं असेल त्याच्याकडून ते काम करून घेतो, असे शंकराचार्य म्हणाले. 

या पंतप्रधानांचं गर्भगृहात असणं शास्त्रानुसार आहे का, असं विचारलं असता त्यांनी सांगितले की, हा सोहळा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे. यावेळी देशात कुणाचंह सरकार असेल, त्या सरकारला या सोहळ्यामध्ये सहभागी करण्याची व्यवस्था करावी लागली असती. हे सरकारचं उत्तरदायित्व आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा निर्णय धर्मशास्त्रानुसारच घेतला असेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या