शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शहनाज बनली आरोही... कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्याने नवऱ्याने दिला तलाक; हिंदू मित्राशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 10:21 IST

एक तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती म्हणून तिला तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक असा प्रकार समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती म्हणून तिला तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली. तरुणीने जेव्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला अपशब्द वापरले. कुटुंबीयही तिच्या विरोधात गेले. जेव्हा कोणताही आधार मिळाला नाही तेव्हा मुलीला तिच्या बालपणीच्या एका हिंदू मित्राची आठवण झाली आणि तिने त्याला आपली व्यथा सांगितली. 

हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मुलीने इस्लाम धर्म सोडून आता एका हिंदू मित्राशी लग्न केलं आहे. बरेलीच्या फरीदपूर पोलीस ठाण्याच्या ढाकनी राजपुरा गावात राहणारी शहनाज हिचा 2018 मध्ये निकाह झाला होता. ती लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती आणि त्यांची पूजा करत असे. शहनाजचे कुटुंबीय याला विरोध करत होते आणि म्हणायचे की त्यांच्या धर्मात पूजा केली जात नाही.

शहनाजने कोणाचेही ऐकले नाही आणि लग्नानंतरही ती भगवान श्रीकृष्णाची भक्त राहिली. दुसरीकडे ही बाब सासरच्या घरात कळताच एकच गोंधळ उडाला. पती आणि सासरच्यांनी तिला पूजा करताना पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हे पाहून पतीने तिला ट्रिपल तलाक दिला. मुलीने जेव्हा तिचा बालपणीचा मित्र पवन कुमार याला तिची व्यथा सांगितली तेव्हा त्याने तिला साथ दिली. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही बरेलीला पोहोचले आणि अगस्त आश्रमात गेले आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.

पती आणि घरच्यांच्या अत्याचारामुळे शहनाज खूप अस्वस्थ होती. कुटुंबातील एकही सदस्य मदत करायला तयार नव्हता. याच दरम्यान त्यांना एक व्यक्ती भेटली. अगस्त आश्रमाबद्दल सांगितले. ही माहिती मिळताच दोघांना आशेचा किरण दिसला आणि क्षणाचाही विलंब न लावता दोघेही आश्रमात पोहोचले आणि त्यांनी आपला मुद्दा महंतांना सांगितला. लग्न झाल्यानंतर आता शहनाजने आता तिचे नावही बदलले आहे. शहनाजने सांगितले की, आता तिला आरोही या नावाने हाक मारावी. तरुणीने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून सुरक्षेची विनंती केली आहे. कुटुंबाकडून जीवाला धोका असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्न