शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच; पाक सांभाळता येत नाही, काश्मीर काय सांभाळणार?- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:00 IST

नवी दिल्ली : काश्मीरबाबत सतत आपलं मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना ...

नवी दिल्ली : काश्मीरबाबत सतत आपलं मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना सांभाळताना पाकिस्तानला नाकीनऊ येत आहेत, तिथे काश्मीर काय सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित करत शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानमध्ये नवा वाद उपस्थित केला आहे. एका पत्रकार परिषदेत शाहिद आफ्रिदीनं हे विधान केलं होतं. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच असल्याचं म्हटलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले, शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्य आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच.  

शाहिद आफ्रिदीनं काश्मीरबाबत वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा आफ्रीदीनं आपल्या वक्तव्यातून भारतावर टीका केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात भारतीय लष्करानं ठार मारलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत शाहिद आफ्रिदीनं सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर, राजकीय नेते आणि मान्यवरांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. 

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहShahid Afridiशाहिद अफ्रिदीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर