शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

दिल्लीत '२६ जुलै'चा हाहाकार; मुलीला शाळेत सोडायला जातानाच तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:00 IST

२६ जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला १३ वर्षं पूर्ण होत असताना आज दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्लीः २६ जुलै म्हणताच मुंबईकरांच्या डोळ्यापुढे तरळतो तो जलप्रलयाने उडवलेला हाहाकार. २००५ साली याच दिवशी मुंबईवर आभाळ फाटलं होतं आणि त्यात अनेक संसार मोडून पडले होते. आज या घटनेला १३ वर्षं पूर्ण होत असताना आणि मुंबईकर त्या आठवणीने धास्तावला असताना, दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला आहे. 

इंदिरापूरम येथे क्षिप्रा सनसिटी भागात ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना, सूरज कांडा हा तरुण आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात होता. त्यावेळी चालता-चालता पाय विजेच्या उघड्या तारेवर पडल्यानं शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. विद्युत विभागाने पावसाळ्याआधी आपलं काम पूर्ण केलं असतं, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी नाराजी आणि चीड स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.  

त्याशिवाय, गाझियाबादमध्ये खोरा भागात इमारतीचा भाग पडून १० वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ग्रेटर नोएडामध्ये तीन मजली बंगल्याचा भाग कोसळला. सुदैवानं, संपूर्ण कुटुंब सुखरूप आहे. इंदिरापूरमजवळ रस्ता खचल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीmonsoon 2018मान्सून 2018