शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सातवी-आठवीतील विद्यार्थी नव्या शैक्षणिक धोरणाचे लाभार्थी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:27 IST

कस्तुरीरंगन समिती सदस्य राजेंद्र गुप्ता यांची विशेष मुलाखत : २०२३ पासून विद्यार्थ्यांना एकाच वेळी विज्ञान व कला शाखा पदवीधर होता येणार

टेकचंद सोनवणे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नवे शैक्षणिक धोरण लगेचच लागू होणार नाही. अंमलबजावणीसाठी २०२३, २०२५ व २०३०, असे तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. यंदा सातवी-आठवीत असलेल्या विद्यार्थांवर या धोरणाचा प्रभाव (इॅम्पक्ट) पडेल. ते जेव्हा १० वी, १२ वीची परीक्षा देतील तोपर्यंत धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली असेल. विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्थांना त्यासाठी तयार व्हावे लागेल, अशी माहिती कस्तुरीरंगन समितीचे सदस्य प्रा. राजेंद्र गुप्ता यांनी दिली. पुढच्या तीन वर्षांमध्ये पहिल्या टप्प्यात नवी संरचना उभी करताना शिक्षकांना विद्यार्थी मूल्यांकनासाठी (असेसमेंट रिफॉर्म) तयार केले जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. गुप्ता यांनी लोकमतशी संवाद साधताना धोरणाविषयी असलेले अनेक संभ्रम दूर केले.

मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यास तीन वर्षांनी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या धोरणाचा लाभ मिळेल, असे सांगताना गुप्ता यांनी अप्रत्यक्षपणे २०२३ पासून पुढे या विद्यार्थ्यांना एकाच वेळी विज्ञान व कला शाखेचा अभ्यास करून पदवीधर होता येणार असल्याचे सूतोवाच केले.अनुभवांवर आधारित शिक्षणावर धोरणकर्त्यांचा भर होता, असे नमूद करून ते म्हणाले, वयाच्या तिसºया वर्षापासून खºया अर्थाने अनुभवाधारित शिक्षण सुरू होईल. धोरण बनवणे सोपे होते; पण अंमलबजावणीसाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग गरजेचा असेल. धोरण आखायचे व अंमलबजावणीसाठी घाई करायची, असे पॅचवर्क उपयोगाचे नाही. भविष्याचा भारत घडवायचा आहे. संसाधने उभारावे लागतील. विषय कसा शिकवायचा, याचा अधिकार शिक्षकास असेल.संलग्न विद्यालयांची संकल्पनाच बाद होणारविद्यापीठांशी संलग्न विद्यालये ही संकल्पनाच बाद होईल. मोठ्या शहरापासून शंभर किलोमीटरवर असलेल्या शहरातील विद्यालयावर विद्यापीठाचे नियंत्रण असते? अभ्यासक्रम हा तर कळीचा मुद्दा आहे. त्या भागाची जशी गरज तसा अभ्यासक्रम त्या-त्या महाविद्यालयात असायला हवा. यासाठी संस्थात्मक उभारणी करावी लागेल. मनुष्यबळ त्यासाठी लागेल.टप्प्याटप्प्याने धोरण राबविणारआरोग्य व शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत घाई नकोच. टप्प्याटप्प्याने धोरण राबवले जाईल, त्यातील २०२३ हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असेल. संरचना उभी राहिल्यास अंमलबजावणी २०२३ पासून होईल.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र