शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:07 IST

देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम

नवी दिल्ली : मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद या सात शहरांतील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत २७ टक्क्यांनी घटल्याचे अ‍ॅनारॉक या स्थावर मालमत्ताविषयक सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे.या सात शहरांमध्ये २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान १,४०० चौरस फुट होते. यंदाच्या वर्षी हे प्रमाण १०२० चौरस फुट इतके खाली घसरले आहे. मुंबईतील घरांचे सरासरी आकारमान सर्वात कमी आहे. मुंबईत २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान ९६० चौरस फुट इतके होते. त्यात सुमारे ४५ टक्के इतकी घसरण होऊन ते प्रमाण यंदा ५३० चौरस फुटांपर्यंत आले आहे. पुण्यामध्येही ३८ टक्के घसरण होऊन तेथील घरांचे सरासरी आकारमान ६०० चौ. फु. झाले आहे.अनॅरॉकच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत कमी मागणी असल्याने घरांच्या किंमतीतही फार वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकांनी लहान आकारमानाची घरे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. देशात सध्या आलेल्या आर्थिक मंदीमुळे स्थावर मालमत्ता तसेच गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती आणखीन बिकट झाली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद येथील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे ८ टक्के, ९ टक्के व १२ टक्क्यांनी घटले आहे. कोलकातामध्ये सरासरी आकारमानात ९ टक्के घसरण होऊन ते आता १,१२० चौरस फुट झाले आहे.देशातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ४५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना सरकारने कमी जीएसटी आकारला आहे तसेच कर्जासंदर्भात काही सवलती दिल्या आहेत. त्याचाही गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम झाला आहे.