शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:07 IST

देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम

नवी दिल्ली : मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद या सात शहरांतील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत २७ टक्क्यांनी घटल्याचे अ‍ॅनारॉक या स्थावर मालमत्ताविषयक सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे.या सात शहरांमध्ये २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान १,४०० चौरस फुट होते. यंदाच्या वर्षी हे प्रमाण १०२० चौरस फुट इतके खाली घसरले आहे. मुंबईतील घरांचे सरासरी आकारमान सर्वात कमी आहे. मुंबईत २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान ९६० चौरस फुट इतके होते. त्यात सुमारे ४५ टक्के इतकी घसरण होऊन ते प्रमाण यंदा ५३० चौरस फुटांपर्यंत आले आहे. पुण्यामध्येही ३८ टक्के घसरण होऊन तेथील घरांचे सरासरी आकारमान ६०० चौ. फु. झाले आहे.अनॅरॉकच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत कमी मागणी असल्याने घरांच्या किंमतीतही फार वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकांनी लहान आकारमानाची घरे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. देशात सध्या आलेल्या आर्थिक मंदीमुळे स्थावर मालमत्ता तसेच गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती आणखीन बिकट झाली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद येथील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे ८ टक्के, ९ टक्के व १२ टक्क्यांनी घटले आहे. कोलकातामध्ये सरासरी आकारमानात ९ टक्के घसरण होऊन ते आता १,१२० चौरस फुट झाले आहे.देशातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ४५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना सरकारने कमी जीएसटी आकारला आहे तसेच कर्जासंदर्भात काही सवलती दिल्या आहेत. त्याचाही गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम झाला आहे.