शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:07 IST

देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम

नवी दिल्ली : मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद या सात शहरांतील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत २७ टक्क्यांनी घटल्याचे अ‍ॅनारॉक या स्थावर मालमत्ताविषयक सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे.या सात शहरांमध्ये २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान १,४०० चौरस फुट होते. यंदाच्या वर्षी हे प्रमाण १०२० चौरस फुट इतके खाली घसरले आहे. मुंबईतील घरांचे सरासरी आकारमान सर्वात कमी आहे. मुंबईत २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान ९६० चौरस फुट इतके होते. त्यात सुमारे ४५ टक्के इतकी घसरण होऊन ते प्रमाण यंदा ५३० चौरस फुटांपर्यंत आले आहे. पुण्यामध्येही ३८ टक्के घसरण होऊन तेथील घरांचे सरासरी आकारमान ६०० चौ. फु. झाले आहे.अनॅरॉकच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत कमी मागणी असल्याने घरांच्या किंमतीतही फार वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकांनी लहान आकारमानाची घरे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. देशात सध्या आलेल्या आर्थिक मंदीमुळे स्थावर मालमत्ता तसेच गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती आणखीन बिकट झाली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद येथील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे ८ टक्के, ९ टक्के व १२ टक्क्यांनी घटले आहे. कोलकातामध्ये सरासरी आकारमानात ९ टक्के घसरण होऊन ते आता १,१२० चौरस फुट झाले आहे.देशातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ४५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना सरकारने कमी जीएसटी आकारला आहे तसेच कर्जासंदर्भात काही सवलती दिल्या आहेत. त्याचाही गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम झाला आहे.