शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

लष्करातील सात जणांना जन्मठेप

By admin | Updated: November 14, 2014 02:23 IST

बनावट चकमकप्रकरणी भारतीय लष्कराने दोन अधिका:यांसह आपल्या सात कर्मचा:याना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

श्रीनगर : चार वर्षापूर्वी ज्यावरून संपूर्ण काश्मीरमध्ये प्रचंड असंतोष उसळला होता त्या 2क्1क् च्या मछिल बनावट चकमकप्रकरणी भारतीय लष्कराने दोन अधिका:यांसह आपल्या सात कर्मचा:याना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या चकमकीत तीन काश्मिरी युवकांना पाकिस्तानी घुसखोर असल्याचे भासवून हकनाक ठार मारले गेले     होते.
अलीकडेच अशाच प्रकारे मोटारीतून जाणा:या दोन काश्मिरी युवकांना आपल्या जवानांनी, पाकिस्तानी दहशतवादी समजून, चुकीने ठार मारल्याची जाहीर कबुली लष्कराने दिली होती. यावरून ‘स्पेशल पॉवर्स अॅक्ट’मुळे अनिर्बंध अधिकार असलेल्या लष्कराची विवेकबुद्धी शाबूत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण रीतसर कोर्ट मार्शलची कारवाई होऊन त्यात लष्कराने घडविलेली चकमक बनावट ठरून लष्करी कर्मचा:यांना कठोर शिक्षा होण्याची काश्मीरच्या संदर्भातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे काश्मिरी जनतेच्या मनात एकूणच लष्कराबद्दल खदखदत असलेला असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
कोर्ट मार्शलमध्ये जन्मठेप ठोठावण्यात आलेल्यांमध्ये 4 राजपूत रेजिमेंटचे त्यावेळचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. पठानिया, कॅप्टन उपेंद्र सिंग व सुभेदार सतबीर सिंग या तीन अधिका:यांसह हवालदार बिरसिंग, शिपाई चंद्रभान, शिपाई नागेंद्र सिंग व शिपाई नरिंदर सिंग या लष्करी जवानांचा समावेश आहे. प्रादेशिक सेनेचे अब्बास हुसैन शाह यांना निदरेष मुक्त केले गेले.
या सर्वाचे सेवालाभ रोखून ठेवण्याचा आदेशही कोर्ट मार्शलने दिला आहे. आपल्या कर्मचा:यांविरुद्धचा फौजदारी खटला लष्कर स्वत: चालविते त्यास ‘कोर्ट मार्शल’ असे म्हटले जाते. या प्रकरणाची कोर्ट मार्शलची न्यायालयीन कारवाई कुपवाडास्थित 68 माऊन्टन ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर दीपक मेहरा यांच्या नेतृत्वाखाली झाली.
अनन्यसाधारण घटना
ही अनन्यसाधारण घटना आहे. अशा घटनांमध्येही न्याय मिळू शकतो यावर काश्मीरमधील कोणाचाही विश्वास नव्हता. मछिलसारखी बनावट चकमकीची घटना पुन्हा पाहावी लागणार नाही आणि ज्यांच्या कोणाच्या मनात तसे करण्याचे असेल त्यांनाही हा इशारा ठरेल, अशी आशा आहे, असे ट¦ीट जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)
 
429 एप्रिल 2क्1क् रोजी झालेल्या या बनावट चकमकीत उत्तर काश्मीरमधील नडिहाल गावातील शेहजाद अहमद, रियाझ अहमद व मोहम्मद शफी या तीन युवकांना लष्करी जवानांनी गोळ्य़ा घालून ठार केले होते.
 
4खटल्यातील साक्षी-पुराव्यांवरून असे सिद्ध झाले की, या तीन युवकांना नोकरी व पैशाचे आमिष दाखवून लष्करानेच कुपवाडा जिल्ह्यातील कलारूस गावात नेले होते व तेथे त्यांना ठार मारण्यात आले. 
 
4भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेले तीन पाकिस्तानी अतिरेकी चकमकीत ठार झाल्याचे कुभांड लष्कराकडून दुस:या दिवशी रचले गेले होते.