शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

लष्करातील सात जणांना जन्मठेप

By admin | Updated: November 14, 2014 02:23 IST

बनावट चकमकप्रकरणी भारतीय लष्कराने दोन अधिका:यांसह आपल्या सात कर्मचा:याना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

श्रीनगर : चार वर्षापूर्वी ज्यावरून संपूर्ण काश्मीरमध्ये प्रचंड असंतोष उसळला होता त्या 2क्1क् च्या मछिल बनावट चकमकप्रकरणी भारतीय लष्कराने दोन अधिका:यांसह आपल्या सात कर्मचा:याना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या चकमकीत तीन काश्मिरी युवकांना पाकिस्तानी घुसखोर असल्याचे भासवून हकनाक ठार मारले गेले     होते.
अलीकडेच अशाच प्रकारे मोटारीतून जाणा:या दोन काश्मिरी युवकांना आपल्या जवानांनी, पाकिस्तानी दहशतवादी समजून, चुकीने ठार मारल्याची जाहीर कबुली लष्कराने दिली होती. यावरून ‘स्पेशल पॉवर्स अॅक्ट’मुळे अनिर्बंध अधिकार असलेल्या लष्कराची विवेकबुद्धी शाबूत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण रीतसर कोर्ट मार्शलची कारवाई होऊन त्यात लष्कराने घडविलेली चकमक बनावट ठरून लष्करी कर्मचा:यांना कठोर शिक्षा होण्याची काश्मीरच्या संदर्भातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे काश्मिरी जनतेच्या मनात एकूणच लष्कराबद्दल खदखदत असलेला असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
कोर्ट मार्शलमध्ये जन्मठेप ठोठावण्यात आलेल्यांमध्ये 4 राजपूत रेजिमेंटचे त्यावेळचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. पठानिया, कॅप्टन उपेंद्र सिंग व सुभेदार सतबीर सिंग या तीन अधिका:यांसह हवालदार बिरसिंग, शिपाई चंद्रभान, शिपाई नागेंद्र सिंग व शिपाई नरिंदर सिंग या लष्करी जवानांचा समावेश आहे. प्रादेशिक सेनेचे अब्बास हुसैन शाह यांना निदरेष मुक्त केले गेले.
या सर्वाचे सेवालाभ रोखून ठेवण्याचा आदेशही कोर्ट मार्शलने दिला आहे. आपल्या कर्मचा:यांविरुद्धचा फौजदारी खटला लष्कर स्वत: चालविते त्यास ‘कोर्ट मार्शल’ असे म्हटले जाते. या प्रकरणाची कोर्ट मार्शलची न्यायालयीन कारवाई कुपवाडास्थित 68 माऊन्टन ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर दीपक मेहरा यांच्या नेतृत्वाखाली झाली.
अनन्यसाधारण घटना
ही अनन्यसाधारण घटना आहे. अशा घटनांमध्येही न्याय मिळू शकतो यावर काश्मीरमधील कोणाचाही विश्वास नव्हता. मछिलसारखी बनावट चकमकीची घटना पुन्हा पाहावी लागणार नाही आणि ज्यांच्या कोणाच्या मनात तसे करण्याचे असेल त्यांनाही हा इशारा ठरेल, अशी आशा आहे, असे ट¦ीट जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)
 
429 एप्रिल 2क्1क् रोजी झालेल्या या बनावट चकमकीत उत्तर काश्मीरमधील नडिहाल गावातील शेहजाद अहमद, रियाझ अहमद व मोहम्मद शफी या तीन युवकांना लष्करी जवानांनी गोळ्य़ा घालून ठार केले होते.
 
4खटल्यातील साक्षी-पुराव्यांवरून असे सिद्ध झाले की, या तीन युवकांना नोकरी व पैशाचे आमिष दाखवून लष्करानेच कुपवाडा जिल्ह्यातील कलारूस गावात नेले होते व तेथे त्यांना ठार मारण्यात आले. 
 
4भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेले तीन पाकिस्तानी अतिरेकी चकमकीत ठार झाल्याचे कुभांड लष्कराकडून दुस:या दिवशी रचले गेले होते.