शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बलात्काराशी संबंधित प्रकरणांचा दोन महिन्यांत निपटारा करा, मोदी सरकारची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 21:47 IST

हैदराबाद, उन्नाव या घटनांसारखेच देशातील अनेक भागात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत.

नवी दिल्ली: हैदराबाद, उन्नाव या घटनांसारखेच देशातील अनेक भागात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कायदा आणखी कठोर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मोदी सरकारनंही या प्रकरणांची दखल घेतली असून, बलात्काराशी संबंधित प्रकरणांचा दोन महिन्यांत निपटारा करण्याची शिफारस राज्य सरकार आणि उच्च न्यायालयांना करण्यात येणार आहे. महिलांवरील बलात्कारांच्या घटनांची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ते बोलत होते.पुढे ते म्हणाले, अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या सर्व प्रकरणाची दोन महिन्यांत चौकशी पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. देशात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर 1023 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात येणार आहेत, अस रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलेलं आहे. 1023 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचं प्रस्तावित असून, त्यापैकी 400 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याबाबत एकमत झालेलं आहे. देशात आधीपासूनच 704 फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.