शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कॅप्टनच्या मुलीची वेगळी मोहीम

By admin | Updated: February 25, 2017 23:42 IST

दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल

जालंधर/नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. या मोेहिमेला ४८ तासांत १,२०० रिअ‍ॅक्शन, १,९९१ शेअर आाणि १४३ कमेण्टस् मिळाल्या. गुरमेहर कौैर ही कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. डीयूतील कार्यक्रमात जेएनयू वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले उमर खालीद आणि शहला रशीद यांना आमंत्रित करण्यात आले होते. याला भाजपने विरोध दर्शविला. यातून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे दुखावलेल्या कौरने सोशल मीडियावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे विरोध दर्शविला. तिने आपला प्रोफाइल फोटो बदलून देशभरातील विद्यार्थ्यांना हा फॉर्मेट अवलंबिण्याचे आवाहन केले. सुरुवातीच्या काही तासांतच कौरच्या मोहिमेला दिल्ली, पंजाब, मुंबई, तसेच देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला. जालंधरची रहिवासी असलेल्या कौरने अभाविपची वागणूक क्रूर आणि धक्कादायक असून, हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे तिने म्हटले. प्रोफाईल छायाचित्रात, तिने हाती प्लेकार्ड धरले असून, त्यावर लिहिले आहे : मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. मी एकटी नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे. निरपराध विद्यार्थ्यांवर अभाविपकडून झालेल्या क्रूर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.हा विद्यार्थ्यांवरील हल्ला नव्हता, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेल्या लोकशाहीवर होता. हा हल्ला भारतात जन्मलेल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर झाला आहे. या हल्ल्याने आमच्या शरीरावर आघात झाला आहे, पण विचारांवर नाही. हे प्रोफाइल छायाचित्र म्हणजे दहशत पसरविण्याला विरोध दर्शविण्याची माझी पद्धत आहे, असेही तिने म्हटले आहे. आपल्या विरोधाबाबत कौर म्हणाली की, सुरुवातीला मी या घटनेशी जोडले गेले नव्हते. मात्र, विरोध करणारे विद्यार्थी जखमी झाल्याचे, तसेच विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्यात आल्याचे कळल्यामुळे मला मोठा धक्का बसला. मला माझा विरोध दर्शविण्यासाठी टेक्नॉलॉजी आणि मीडियाचा उपयोग करणे योग्य वाटले. यावरून परिस्थिती किती बिकट आहे हे तुम्हाला समजू शकते. हा दोन पक्षांचा मुद्दा नाही. हा विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे आपली भूमिका थोपविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करतात त्यांच्याविरुद्धचा हा यलगार आहे, असेही ती म्हणाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)शांततेवरही संदेशकॅप्टन मंदीपसिंग कारगिलमध्ये शहीद झाले तेव्हा गुरमेहर केवळ दोन वर्षांची होती. यापूर्वी २०१६ मध्येही कौरने भारत-पाक शांततेवर एक संदेश दिला होता. त्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता.