शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

शहीद कॅप्टनच्या मुलीची वेगळी मोहीम

By admin | Updated: February 25, 2017 23:42 IST

दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल

जालंधर/नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. या मोेहिमेला ४८ तासांत १,२०० रिअ‍ॅक्शन, १,९९१ शेअर आाणि १४३ कमेण्टस् मिळाल्या. गुरमेहर कौैर ही कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. डीयूतील कार्यक्रमात जेएनयू वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले उमर खालीद आणि शहला रशीद यांना आमंत्रित करण्यात आले होते. याला भाजपने विरोध दर्शविला. यातून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे दुखावलेल्या कौरने सोशल मीडियावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे विरोध दर्शविला. तिने आपला प्रोफाइल फोटो बदलून देशभरातील विद्यार्थ्यांना हा फॉर्मेट अवलंबिण्याचे आवाहन केले. सुरुवातीच्या काही तासांतच कौरच्या मोहिमेला दिल्ली, पंजाब, मुंबई, तसेच देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला. जालंधरची रहिवासी असलेल्या कौरने अभाविपची वागणूक क्रूर आणि धक्कादायक असून, हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे तिने म्हटले. प्रोफाईल छायाचित्रात, तिने हाती प्लेकार्ड धरले असून, त्यावर लिहिले आहे : मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. मी एकटी नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे. निरपराध विद्यार्थ्यांवर अभाविपकडून झालेल्या क्रूर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.हा विद्यार्थ्यांवरील हल्ला नव्हता, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेल्या लोकशाहीवर होता. हा हल्ला भारतात जन्मलेल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर झाला आहे. या हल्ल्याने आमच्या शरीरावर आघात झाला आहे, पण विचारांवर नाही. हे प्रोफाइल छायाचित्र म्हणजे दहशत पसरविण्याला विरोध दर्शविण्याची माझी पद्धत आहे, असेही तिने म्हटले आहे. आपल्या विरोधाबाबत कौर म्हणाली की, सुरुवातीला मी या घटनेशी जोडले गेले नव्हते. मात्र, विरोध करणारे विद्यार्थी जखमी झाल्याचे, तसेच विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्यात आल्याचे कळल्यामुळे मला मोठा धक्का बसला. मला माझा विरोध दर्शविण्यासाठी टेक्नॉलॉजी आणि मीडियाचा उपयोग करणे योग्य वाटले. यावरून परिस्थिती किती बिकट आहे हे तुम्हाला समजू शकते. हा दोन पक्षांचा मुद्दा नाही. हा विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे आपली भूमिका थोपविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करतात त्यांच्याविरुद्धचा हा यलगार आहे, असेही ती म्हणाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)शांततेवरही संदेशकॅप्टन मंदीपसिंग कारगिलमध्ये शहीद झाले तेव्हा गुरमेहर केवळ दोन वर्षांची होती. यापूर्वी २०१६ मध्येही कौरने भारत-पाक शांततेवर एक संदेश दिला होता. त्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता.