शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

शहीद कॅप्टनच्या मुलीची वेगळी मोहीम

By admin | Updated: February 25, 2017 23:42 IST

दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल

जालंधर/नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) रामजस कॉलेजमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर डीयूची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध (अभाविप) सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. या मोेहिमेला ४८ तासांत १,२०० रिअ‍ॅक्शन, १,९९१ शेअर आाणि १४३ कमेण्टस् मिळाल्या. गुरमेहर कौैर ही कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. डीयूतील कार्यक्रमात जेएनयू वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले उमर खालीद आणि शहला रशीद यांना आमंत्रित करण्यात आले होते. याला भाजपने विरोध दर्शविला. यातून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे दुखावलेल्या कौरने सोशल मीडियावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे विरोध दर्शविला. तिने आपला प्रोफाइल फोटो बदलून देशभरातील विद्यार्थ्यांना हा फॉर्मेट अवलंबिण्याचे आवाहन केले. सुरुवातीच्या काही तासांतच कौरच्या मोहिमेला दिल्ली, पंजाब, मुंबई, तसेच देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला. जालंधरची रहिवासी असलेल्या कौरने अभाविपची वागणूक क्रूर आणि धक्कादायक असून, हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे तिने म्हटले. प्रोफाईल छायाचित्रात, तिने हाती प्लेकार्ड धरले असून, त्यावर लिहिले आहे : मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. मी एकटी नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे. निरपराध विद्यार्थ्यांवर अभाविपकडून झालेल्या क्रूर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.हा विद्यार्थ्यांवरील हल्ला नव्हता, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेल्या लोकशाहीवर होता. हा हल्ला भारतात जन्मलेल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर झाला आहे. या हल्ल्याने आमच्या शरीरावर आघात झाला आहे, पण विचारांवर नाही. हे प्रोफाइल छायाचित्र म्हणजे दहशत पसरविण्याला विरोध दर्शविण्याची माझी पद्धत आहे, असेही तिने म्हटले आहे. आपल्या विरोधाबाबत कौर म्हणाली की, सुरुवातीला मी या घटनेशी जोडले गेले नव्हते. मात्र, विरोध करणारे विद्यार्थी जखमी झाल्याचे, तसेच विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्यात आल्याचे कळल्यामुळे मला मोठा धक्का बसला. मला माझा विरोध दर्शविण्यासाठी टेक्नॉलॉजी आणि मीडियाचा उपयोग करणे योग्य वाटले. यावरून परिस्थिती किती बिकट आहे हे तुम्हाला समजू शकते. हा दोन पक्षांचा मुद्दा नाही. हा विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे आपली भूमिका थोपविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करतात त्यांच्याविरुद्धचा हा यलगार आहे, असेही ती म्हणाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)शांततेवरही संदेशकॅप्टन मंदीपसिंग कारगिलमध्ये शहीद झाले तेव्हा गुरमेहर केवळ दोन वर्षांची होती. यापूर्वी २०१६ मध्येही कौरने भारत-पाक शांततेवर एक संदेश दिला होता. त्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता.