शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "२०१४ नंतर मोदींसारखा आक्रमक प्रचार करणारा नेता देशाला मिळाला आणि लोक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:41 IST

आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हातात सगळं सोपवलंय, सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य.

नुकतेच देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर दुसरीकडे भाजपला चांगलं यश मिळालं. या निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसमधील वाद समोर आला होता, परंतु अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. "२०१४ नंतर कमकुवत होण्याचं कारण असं की मोदींसारखा आक्रमक प्रचार करणारा नेता देशाला मिळाला. त्यांच्या प्रचाराच्या भाषेमुळे, वक्तृत्वामुळे लोक वाहवत गेले. अनेक मोठ्या नेत्यांचादेखील पराभव झाला," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 

"त्यांनी अनेक आश्वासानं दिली. खोटा प्रचार करायचा आणि लोकांना भावनेच्या भरात न्यायचं अशा प्रचारामुळे लोक वाहवत गेले. परंतु आता लोकांना कळायला लागलं आहे," असंही शिंदे म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केला. "मोदींचा अचानक उदय झाला. अनेक लोक त्यांच्या वक्तव्यात वाहवत गेले. हे अनेक ठिकाणी झालं. परंतु दक्षिण भारतात तसं झालं नाही. आम्ही तरुणांना सर्व नेतृत्व द्यायचं आणि बदल त्यांना करायला सांगायचे असा प्रकार करून पाहिला, त्यात थोडी गफलत झाल्यासारखं मला वाटतं. मी पक्षावर थेट टीका करू शकत नाही. ही एक प्रक्रिया आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

"काँग्रेसचा आलेख हळूहळू खाली येत गेला त्याला काही कारणं आहेत. आम्ही सर्वच १० वर्षांची सत्ता भोगल्यामुळे सक्रीय नव्हतो. संघटना बांधण्याचं काम मुख्यत्वे व्हायला हवं होतं, तेही झालं नाही. त्यामुळे आम्हाला थोडं मागे पाहावं लागतंय," असंही ते म्हणाले. "तरुणांच्या हाती सर्व दिलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. ते स्थिर नको. ते स्थिर झालं तर प्रगती होत नाही. जनतेनं यावेळी बदल हवा होता आणि त्यामुळे त्यांनी मोदींना कौल दिला, असं माझं मत आहे," अशंही शिंदे यांनी नमूद केलं.

"उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही""सोनिया गांधी या शक्तिशाली आणि समंजस नेत्या आहेत. त्यांना अनेक गोष्टींची कल्पना आहे. त्यांच्या इतकं हुशार असणारा नेता आमच्याकडे नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. मुलाखतीदरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना काय सुचवू इच्छिता असा सवाल करण्यात आला. "ज्यावेळी आमच्या बैठका होतात तेव्हा आम्ही सांगतो. परंतु तीन चार वर्षांत भेट झाली नाही. मी गेलोही नाहीये. मला त्यांच्याकडून बोलावणं येतं, परंतु आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हाती सर्व सोपवलं आहे," असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

"आम्ही गांधी घराण्याला स्वीकारणारेच""आम्ही जे बोलतो ते काँग्रेसच्या अध्यक्षांसोबत बोलतो. बाकीचे जे खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांना बोलून काही फरक पडत नाही. प्रियंका आणि राहुल गांधी आमचे नेतेच आहेत आणि त्यांच्याशी संवाद असतात," असंही त्यांनी सांगितलं. "आम्ही गांधी घराण्याला स्वीकारणारे आहोत. त्यातून आलेलं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. पण ते कोणी करावं हे समितीच ठरवेल. गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी