शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "२०१४ नंतर मोदींसारखा आक्रमक प्रचार करणारा नेता देशाला मिळाला आणि लोक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:41 IST

आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हातात सगळं सोपवलंय, सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य.

नुकतेच देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर दुसरीकडे भाजपला चांगलं यश मिळालं. या निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसमधील वाद समोर आला होता, परंतु अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. "२०१४ नंतर कमकुवत होण्याचं कारण असं की मोदींसारखा आक्रमक प्रचार करणारा नेता देशाला मिळाला. त्यांच्या प्रचाराच्या भाषेमुळे, वक्तृत्वामुळे लोक वाहवत गेले. अनेक मोठ्या नेत्यांचादेखील पराभव झाला," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 

"त्यांनी अनेक आश्वासानं दिली. खोटा प्रचार करायचा आणि लोकांना भावनेच्या भरात न्यायचं अशा प्रचारामुळे लोक वाहवत गेले. परंतु आता लोकांना कळायला लागलं आहे," असंही शिंदे म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केला. "मोदींचा अचानक उदय झाला. अनेक लोक त्यांच्या वक्तव्यात वाहवत गेले. हे अनेक ठिकाणी झालं. परंतु दक्षिण भारतात तसं झालं नाही. आम्ही तरुणांना सर्व नेतृत्व द्यायचं आणि बदल त्यांना करायला सांगायचे असा प्रकार करून पाहिला, त्यात थोडी गफलत झाल्यासारखं मला वाटतं. मी पक्षावर थेट टीका करू शकत नाही. ही एक प्रक्रिया आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

"काँग्रेसचा आलेख हळूहळू खाली येत गेला त्याला काही कारणं आहेत. आम्ही सर्वच १० वर्षांची सत्ता भोगल्यामुळे सक्रीय नव्हतो. संघटना बांधण्याचं काम मुख्यत्वे व्हायला हवं होतं, तेही झालं नाही. त्यामुळे आम्हाला थोडं मागे पाहावं लागतंय," असंही ते म्हणाले. "तरुणांच्या हाती सर्व दिलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. ते स्थिर नको. ते स्थिर झालं तर प्रगती होत नाही. जनतेनं यावेळी बदल हवा होता आणि त्यामुळे त्यांनी मोदींना कौल दिला, असं माझं मत आहे," अशंही शिंदे यांनी नमूद केलं.

"उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही""सोनिया गांधी या शक्तिशाली आणि समंजस नेत्या आहेत. त्यांना अनेक गोष्टींची कल्पना आहे. त्यांच्या इतकं हुशार असणारा नेता आमच्याकडे नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. मुलाखतीदरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना काय सुचवू इच्छिता असा सवाल करण्यात आला. "ज्यावेळी आमच्या बैठका होतात तेव्हा आम्ही सांगतो. परंतु तीन चार वर्षांत भेट झाली नाही. मी गेलोही नाहीये. मला त्यांच्याकडून बोलावणं येतं, परंतु आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हाती सर्व सोपवलं आहे," असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

"आम्ही गांधी घराण्याला स्वीकारणारेच""आम्ही जे बोलतो ते काँग्रेसच्या अध्यक्षांसोबत बोलतो. बाकीचे जे खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांना बोलून काही फरक पडत नाही. प्रियंका आणि राहुल गांधी आमचे नेतेच आहेत आणि त्यांच्याशी संवाद असतात," असंही त्यांनी सांगितलं. "आम्ही गांधी घराण्याला स्वीकारणारे आहोत. त्यातून आलेलं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. पण ते कोणी करावं हे समितीच ठरवेल. गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी