शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 08:20 IST

ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोनाची साथ आता कमी झाली आहे. मात्र, कोरोनाच्या काळात दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातील सवलत बंद करण्यात आली होती. ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.

सरकारचे म्हणणे आहे की, बहुतांश श्रेणीतील रेल्वे भाडे आधीच कमी आहे. सर्व प्रवाशांसाठी प्रवास खर्चाचा ५० टक्के भार रेल्वे पूर्वीपासून घेत आहे. कोरोनामुळे २०२० - २१ मध्ये खूप कमी प्रवाशांनी प्रवास केला. २०१९-२० च्या दरम्यान सरकारच्या आवाहनानंतर २२.६२ लाख ज्येष्ठ नागरिकांनी सवलत योजना स्वत: हून सोडून दिली.

सरकारने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना सवलतीचे नियम पूर्वीसारखेच असतील. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू यांना भाड्यात पुन्हा सूट देण्यात येणार नाही.

ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी चहा, कॉफी स्वस्त!

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजधानी, दुरांतो, शताब्दी आणि वंदे भारत या गाड्यांमधून रेल्वेने चहा-कॉफीवरील सेवा शुल्क हटवले आहे. चहा, कॉफी व पाणी ऑर्डर करण्यासाठी सेवा शुल्क द्यावे लागणार नाही. जेवण मागवण्यासाठी सेवा शुल्क लागेल. 

सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका

२०१७-१८ च्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे रेल्वेला १,४९१ कोटींचा तोटा झाला. हा तोटा पुढील वर्षी वाढून १,६३६ कोटी झाला आणि २०१९-२० मध्ये १,६६७ कोटी झाला. - अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार