शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाजपचे ज्येष्ठ नेते घेणार प्रवक्त्यांचा क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 12:13 IST

माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्यांचा क्लास भाजपचे ज्येष्ठ नेते घेत आहेत. पक्ष कार्यालयात प्रत्येक दिवशी दुपारी 3 वाजता या प्रवक्त्यांचा क्लास घेतला जातो

नवी दिल्ली - सध्या देशातील वातावरण संवेदनशील असल्यामुळे तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी कोणतीच जोखीम घेण्यास तयार नाही. भारत-पाकिस्तान संघर्ष, एअर स्ट्राईक, राफेल अशा संवेदनशील विषयांवर पक्षाची योग्य बाजू मांडण्यासाठी भाजप गंभीरतेने विचार करत आहे. याचसाठी माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्यांचा क्लास भाजपचे ज्येष्ठ नेते घेत आहेत. पक्ष कार्यालयात प्रत्येक दिवशी दुपारी 3 वाजता या प्रवक्त्यांचा क्लास घेतला जातो. 

माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा, त्या चर्चासत्रात सहभागी असणारे विरोधी नेते, तज्ज्ञमंडळी यांच्याशी गंभीर विषयांवर बाजू मांडताना सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांची दमछाक होताना पाहायला मिळते, कधीकधी असे विषय समोर येतात ज्यामध्ये पक्षाची भूमिका मांडताना प्रवक्त्यांच्या नाकीनऊ येतात. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एखाद्या गंभीर विषयांवर पक्ष प्रवक्त्यांनी कशारितीने पक्षाची तसेच सरकार बाजू मांडावी याचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आगामी लोकसभा निवडणुका संपेपर्यंत सुरुच राहणार आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांचा क्लास घेतला. यामध्ये देशात सध्या सुरू असणाऱ्या विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका काय आहे, ती माध्यमांसमोर कशी मांडली पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले. भारत-पाकमधील गंभीर मुद्द्यांवर बोलताना कशापद्धतीचे गांभीर्य राखलं पाहीजे या सूचना दिल्या गेल्या. 

एवढचं नव्हे तर सहकार, आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय, राज्य आणि शहरे अशा वेगवेगळ्या समस्यांवर बोलण्यासाठी त्या त्या विषयांतील जाणकार मंडळी अशा प्रवक्त्यांना माध्यमांतील चर्चेसाठी पाठवले पाहीजे. या बैठकीत पक्षाच्या प्रवक्त्यांसोबतच केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरही सहभागी होते. 

तसेच आगामी काळात केंद्र सरकारचे ज्येष्ठ मंत्रीदेखील पक्षाची चांगली बाजू मांडण्यासाठी, सरकारच्या कालावधीत घेतलेले लोकपयोगी निर्णय, विकासकामांचा लेखाजोखा याबाबत आकडेवारी घेऊन माध्यमांसमोर जातील. तसेच या ज्येष्ठ नेत्यांच्या व्यस्त दिनक्रमात व्यत्यय येऊ नये साठी समन्वयकाची नेमणूक करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. 

विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन करण्याची मोठी जबाबदारी प्रवक्त्यांवर असते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पार्टीने या प्रवक्त्यांचा क्लास घेऊन योग्य ती खबरदारी घेतल्याचे दिसून येते. 

टॅग्स :BJPभाजपाArun Jaitleyअरूण जेटलीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरdelhiदिल्लीElectionनिवडणूकPoliticsराजकारणMediaमाध्यमे