शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

स्थलांतरित कामगारांना मूळ गावी पाठवा, केंद्रावर दबाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:16 IST

केंद्र सरकारवर अनेक राज्यांकडून वाढला दबाव; मजुरांनाही आशा

नवी दिल्ली : २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात ज्या स्थलांतरीत कामगारांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत, अशा लाखो कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाऊ देण्यास परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचा दबाव अनेक राज्यांकडून केंद्र सरकारवर वाढत आहे. या कामगारांना २१ दिवस आश्रय शिबिरे आणि अन्य ठिकाणी ठेवण्यात आले. २१ दिवसांनंतर घरी जाऊ देण्यात येईल, या आशेवर हे कामगार एकाच ठिकाणी थांबले.

काही राज्यांनी या कामगारांना बसमधून घेऊन जाण्याची तयारीही दर्शविली. केंद्र सरकारने यासाठी रेल्वे सेवा द्यावी, अशीही या राज्यांची अपेक्षा आहे. हे कामगार आता गावी जाण्यासाठी उतावीळ झालेले आहेत आणि हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत, याकडेही राज्यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे.राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अशी मागणी केली आहे की, या कामगारांना स्थलांतराची परवानगी द्यावी. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ११ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसमोर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कामगारांचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी हा मुद्दा स्वतंत्रपणे उपस्थित करत या कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहचविण्यासाठी मार्ग शोधण्याचे मत व्यक्त केले होते. शिबिरात या कामगारांना ठेवण्यापेक्षा हा उपाय चांगला असल्याचेही त्यांनी म्हटले होते.स्वतंत्र डाटा बँक तयार करासूत्रांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने राज्यांना असे निर्देश दिले आहेत की, प्रत्येक स्थलांतरित कामगाराची स्वतंत्र डाटा बँक तयार करावी. जेणेकरून, जेव्हा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास सुरू होईल तेव्हा अराजकता निर्माण होऊ नये.

टॅग्स :MumbaiमुंबईMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या