शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

स्थलांतरित कामगारांना मूळ गावी पाठवा, केंद्रावर दबाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:16 IST

केंद्र सरकारवर अनेक राज्यांकडून वाढला दबाव; मजुरांनाही आशा

नवी दिल्ली : २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात ज्या स्थलांतरीत कामगारांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत, अशा लाखो कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाऊ देण्यास परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचा दबाव अनेक राज्यांकडून केंद्र सरकारवर वाढत आहे. या कामगारांना २१ दिवस आश्रय शिबिरे आणि अन्य ठिकाणी ठेवण्यात आले. २१ दिवसांनंतर घरी जाऊ देण्यात येईल, या आशेवर हे कामगार एकाच ठिकाणी थांबले.

काही राज्यांनी या कामगारांना बसमधून घेऊन जाण्याची तयारीही दर्शविली. केंद्र सरकारने यासाठी रेल्वे सेवा द्यावी, अशीही या राज्यांची अपेक्षा आहे. हे कामगार आता गावी जाण्यासाठी उतावीळ झालेले आहेत आणि हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत, याकडेही राज्यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे.राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अशी मागणी केली आहे की, या कामगारांना स्थलांतराची परवानगी द्यावी. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ११ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसमोर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कामगारांचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी हा मुद्दा स्वतंत्रपणे उपस्थित करत या कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहचविण्यासाठी मार्ग शोधण्याचे मत व्यक्त केले होते. शिबिरात या कामगारांना ठेवण्यापेक्षा हा उपाय चांगला असल्याचेही त्यांनी म्हटले होते.स्वतंत्र डाटा बँक तयार करासूत्रांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने राज्यांना असे निर्देश दिले आहेत की, प्रत्येक स्थलांतरित कामगाराची स्वतंत्र डाटा बँक तयार करावी. जेणेकरून, जेव्हा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास सुरू होईल तेव्हा अराजकता निर्माण होऊ नये.

टॅग्स :MumbaiमुंबईMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या