शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
4
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
5
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
6
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
7
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
8
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
9
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
11
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
12
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
13
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
14
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
16
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
17
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
18
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
19
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
20
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

स्थलांतरित कामगारांना मूळ गावी पाठवा, केंद्रावर दबाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:16 IST

केंद्र सरकारवर अनेक राज्यांकडून वाढला दबाव; मजुरांनाही आशा

नवी दिल्ली : २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात ज्या स्थलांतरीत कामगारांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत, अशा लाखो कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाऊ देण्यास परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचा दबाव अनेक राज्यांकडून केंद्र सरकारवर वाढत आहे. या कामगारांना २१ दिवस आश्रय शिबिरे आणि अन्य ठिकाणी ठेवण्यात आले. २१ दिवसांनंतर घरी जाऊ देण्यात येईल, या आशेवर हे कामगार एकाच ठिकाणी थांबले.

काही राज्यांनी या कामगारांना बसमधून घेऊन जाण्याची तयारीही दर्शविली. केंद्र सरकारने यासाठी रेल्वे सेवा द्यावी, अशीही या राज्यांची अपेक्षा आहे. हे कामगार आता गावी जाण्यासाठी उतावीळ झालेले आहेत आणि हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत, याकडेही राज्यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे.राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अशी मागणी केली आहे की, या कामगारांना स्थलांतराची परवानगी द्यावी. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ११ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसमोर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कामगारांचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी हा मुद्दा स्वतंत्रपणे उपस्थित करत या कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहचविण्यासाठी मार्ग शोधण्याचे मत व्यक्त केले होते. शिबिरात या कामगारांना ठेवण्यापेक्षा हा उपाय चांगला असल्याचेही त्यांनी म्हटले होते.स्वतंत्र डाटा बँक तयार करासूत्रांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने राज्यांना असे निर्देश दिले आहेत की, प्रत्येक स्थलांतरित कामगाराची स्वतंत्र डाटा बँक तयार करावी. जेणेकरून, जेव्हा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास सुरू होईल तेव्हा अराजकता निर्माण होऊ नये.

टॅग्स :MumbaiमुंबईMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या