शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

खतांची जादा दराने विक्री

By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST

शेतकर्‍यांची लूट : कल सेंद्रिय खताकडे

शेतकर्‍यांची लूट : कल सेंद्रिय खताकडे

सावरवाडी : करवीर तालुक्यात ऐन उन्हाळी हंगामात खत विक्रेते विविध रासायनिक खतांची जादा दराने विक्री करू लागल्याने रासायनिक खतातून शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. ऐन हंगामात खतांचे दर वाढवून जादा दराने खतांची विक्री केली जात आहे.
एकीकडे वाढत्या महागाईच्या काळात शेतीच्या खर्चाचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे उसाची बिले वेळेत शेतकर्‍यांना मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर रासायनिक खतांचे ग्रामीण भागातील खत विक्रेते दुकानदार जादा दराने खताची विक्री करू लागले आहेत.
रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकर्‍यांचा कल शेणखत व सेंद्रिय जीवाणू खते वापरण्याकडे आहे. रासायनिक खतांची जादा दराने विक्री करून ग्रामीण भागातील दुकानदारांकडून व सहकारी संस्थांकडून लूट केली जात आहे. जादा दराच्या पावत्याही शेतकर्‍यांना दिल्या जात नाहीत. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांच्याकडून केली जात आहे.
आगामी खरीप हंगाम तोंडावर आल्याने जादा दराने रासायनिक खतांची विक्री करण्यात येत आहे. यंदा शेतकर्‍यांना रासायनिक खतापासून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. शेतीला लागणार्‍या रासायनिक खतांचे दर भडकल्याने खत घेण्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागातील खत विक्रीही दुकानदारांनी जादा आर्थिक नफा होण्याकरिता जादा दराने खताची विक्री सुरू केली आहे.
दरम्यान, रासायनिक खतांचे दर सर्वत्र स्थिर न केल्यास अथवा जादा दराने खतांची विक्री केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन शेतकरी कामगार पक्षातर्फे करणार असल्याचा इशारा करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला.
वार्ताहर.