शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

सीमा पाकिस्‍तानात अंजूसाठी बनली होती 'संकट'! नसरुल्लासोबत घालवावे लागले 3 महिने, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 15:04 IST

आपल्याला पाकिस्तानात एवढे दिवस थांबावे लागले याचे एक मोठे कारण सीमा हैदर असल्याचेही अंजूने म्हटले आहे.

अंजू याच वर्षाच्या जुलै महिन्यात प्रियकर नसरुल्लाला भेटण्यासाठी भारतातूनपाकिस्तानात गेली होती. ती तेथे सुमारे साडेचार महिने राहिल्यानंतर, 29 नोव्हेंबरला भारतात परतली. भारतात आल्यानंतर, आपण मुलांना भेटण्यासाठी परतलो आहोत. मला त्यांची खूप आठवण येत होती. आपण तेथे स्वेच्छेने गेले होते आणि इच्छा असेपर्यंत थांबलो, असे मंजूने वारंवार म्हटले आहे. मात्र आता, आपल्याला पाकिस्तानात एवढे दिवस थांबावे लागले याचे एक मोठे कारण सीमा हैदर असल्याचेही तिने म्हटले आहे.

मुळची पाकिस्तानातील असलेली सीमा हैदर याच वर्षी भारतात आली आहे. सीमा तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी अवैधरित्या नेपाळमार्गे नोएडामध्ये आली. यानंतर तिला अटकही झाली होती. हे प्रकरण बरेच चर्चेत होते. यानंतर अंजू नावाची महिला भारतातून पाकिस्तानात गेली. सोशल मीडियावर तिचीही बरीच चर्चा झाली.

...म्हणून अंजूला पाकिस्तानातून भारतात यायला उशीर झाला -अंजू टीडब्ल्यूडब्ल्यू नावाच्या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना म्हणाली, मी एक महिन्याचा व्हिसा घेऊन गेले होते. मी एक महिन्यानंतर पाकिस्तानातून परतणार होते. मात्र, सीमा हैदर प्रकरण घडले आणि वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. अनेक लोक हे कटकारस्थान असल्याचे म्हणू लागले. यामुळे मला परिस्थिती योग्य वाटली नाही आणि मी व्हिसा वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच मी साधारणपणे सव्वा चार महिन्यांपर्यंत पाकिस्तानात राहिले. याचवेळी, आपले सीमा सोबत कसल्याही प्रकारचे संबंध नव्हते. मात्र, तिच्यामुळे पाकिस्तानातून यायला उशीर नक्कीच झाला, असेही अंजूने म्हटले आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारत