शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अदनान सामीला भारताचे नागरिकत्व मिळू शकते, मला का नाही? सीमाची राष्ट्रपतींना विनंती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:56 IST

सीमा हैदरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भारतीय नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे.

Seema Haider:पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या सीमा हैदरने राष्ट्रपती भवनाकडे याचिका पाठवली आहे. तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी ही याचिका पाठवली असून, नागरिकत्व मिळवण्यासाठी याचिकेत पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीचा हवाला दिला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली की, जर तिला माफी दिली तर ती आयुष्यभर पतीसोबत राहू शकेल. प्रसिद्ध गायक अदनान सामीला भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर नागरिकत्व मिळाले. त्यामुळे तिलाही नागरिकत्व मिळायला हवे. परवानगी मिळाल्यानंतर भारतात सन्मानाने राहू शकेन, असेही सीमाने याचिकेत म्हटले आहे.

6 वर्षात 4000 लोकांना नागरिकत्व मिळालेयाचिकेत सरकारी आकडेवारीचाही हवाला देण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षांत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील 4 हजार नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सीमाच्या वतीने अधिवक्ता एपी सिंह यांनी याचिकेत सांगितले की, सीमा तपासात सर्व यंत्रणांना सहकार्य करत आहे. 'पाकिस्तानी गुप्तहेर' असल्याच्या आरोपावरुन ती लाय डिटेक्टर चाचणी घेण्यासही तयार आहे.

सीमा भारतात कशी आली?ऑनलाईन पबजी खेळताना सीमा आणि सचिनची ओळख झाली आणि ओळखचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून दुबई आणि दुबईहून नेपाळमध्ये आली. तिथे दोघांनी लग्न केले आणि नेपाळमार्गेच ती भारतात दाखल झाली. खोटी माहिती देऊन अवैधरित्या भारतात आली. भारतात आल्यानंतर तिला पोलिसांनी अट केली आणि नंतर जामिनावर तिची सुटका केली. सध्या युपी एटीएस तिची चौकशी करत आहे. 

अदनान सामीला नागरिकत्व कधी मिळाले?पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. तो 13 मार्च 2001 रोजी भारतात आला होता. सुरुवातीला तो व्हिजिटर व्हिसावर भारतात आला आणि नंतर वेळोवेळी व्हिसा वाढवून घेतला. या काळात त्याने दोनदा नागरिकत्वासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला. अखेर पाकिस्तानचे मूळ नागरिकत्व सोडल्यानंतर त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्ष