शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

लष्कराचा अपमान करणा-या आझम खानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

By admin | Updated: July 1, 2017 11:30 IST

आझम खान यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर बलात्काराचा आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 1 - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिजनोरमधील चंदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझम खान यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर बलात्काराचा आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "आझम खान यांच्याविरोधात कलम 124 अ, 131 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनिल पांडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे", अशी माहिती चंदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय कुमार सिंग यांनी दिली आहे. 
 
(आझम खान यांची जीभ आणा, 50 लाखांचं बक्षीस मिळवा- विहिंपच्या नेत्याची घोषणा)
 
आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली होती. त्यांनी सदर पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे शहाजहाँपूरमधील जिल्हा समन्वयक राजेश कुमार अवस्ती यांनी आझम खान यांची जीभ आणणाऱ्याला 50 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 
 
काय म्हणाले होते आझम खान - 
"महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन जात आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे". आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते. 
 
स्पष्टीकरण देताना म्हणाले मी भाजपाची आयटम गर्ल - 
मी भाजपाची आयटम गर्ल आहे, ते इतर कोणाबद्दल बोलत नाहीत. त्यांनी सर्व लक्ष माझ्यावर केंद्रीत करुनच उत्तरप्रदेशात निवडणूक लढवल्या असं आझम खान बोलले होते. स्पष्टीकरण देताना आझम खान म्हणाले की, मीडियाने माझ्या विधानांचा विपर्यास करुन चुकीचा अर्थ लावला. माझ्यामुळे लष्कराच्या मनोधैर्य कसे खचू शकते? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेले तेव्हा लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम झाला. 
 
याआधीही केली आहेत वादग्रस्त वक्तव्य -
 
आझम खान यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ताज्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर त्यांनी केलेलं वक्तव्य. या सामूहिक बलात्काराला त्यांनी एक राजकीय षडयंत्र म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर मागितलं, तेव्हा मात्र आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याची पळवाट त्यांनी काढली. नंतर त्यांनी विनाअट माफीदेखील मागितली. न्यायालयाने त्यांचा हा माफीनामा स्विकार केला होता. 
 
तर मुस्लिम देशात आझम खान यांचा झाला असता शिरच्छेद - स्वामी
आझम खान यांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना स्वामी म्हणाले, "आझम खानसारख्या लोकांना चर्चेत राहायचे असते. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. आझम खान नेहमीच अशी वाह्यात वक्तवे करत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद केला गेला असता, किंवा त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले असते."
 
पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.