शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

उपग्रह क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे मिळणार स्वसंरक्षणात बळकटी - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:09 IST

पृथ्वीपासून नजीकच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करणे ही भारताच्या दृष्टीने अद्वितीय उपलब्धी मानली जात आहे. या मोहिमेत पृथ्वीपासून ३०० कि.मी. अंतरावरील कक्षेत भ्रमण करणारा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट केला गेला.

नवी दिल्ली : पृथ्वीपासून नजीकच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करणे ही भारताच्या दृष्टीने अद्वितीय उपलब्धी मानली जात आहे. या मोहिमेत पृथ्वीपासून ३०० कि.मी. अंतरावरील कक्षेत भ्रमण करणारा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट केला गेला.भारताने ही चाचणी कोणताही देश डोळ्यापुढे ठेवून केलेली नाही, तसेच हे करताना भारताने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान म्हणाले की, वेगवान प्रगती करणाऱ्या भारताने स्वसंरक्षणास अधिक बळकटी देण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. बाह्य अंतराळाचा शस्त्रस्पर्धेसाठी वापर करण्यास भारताने नेहमीच विरोध केला आहे. या चाचणीने भारताच्या या भूमिकेत बदल झालेला नाही. भारतीयांची सुरक्षा व कल्याणासाठी भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. आमचे सामरिक उद्दिष्ट युद्धाचे वातावरण तयार करण्याचे नव्हे, तर शांततेची सुनिश्चिती करणे हे आहे. जगाच्या या भागाच्या सुरक्षेसाठी भारत बलशाली असणे गरजेचे आहे.कृषी, संरक्षण, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, करमणूक, हवामानाचा अभ्यास, दिशा निर्देशन, शिक्षण, वैद्यकीय सेवा या व इतरही अनेक कामांसाठी आज आपण अंतराळाचा व उपग्रहांचा वापर करीत आहोत. अशा परिस्थितीत भारताच्या अंतराळात कार्यरत असलेल्या उपग्रहांच्या सुरक्षिततेची सिद्धता करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.मोदी म्हणाले की, हे सर्व काम पूर्णपणे देशी तंत्रज्ञानाने करण्यात आले. याने अंतराळ कार्यक्रमात भारत आणखी ताठ मानेने उभा राहिला आहे. यामुळे भारत अधिक बलशाली व अधिक सुरक्षित होईल आणि याने शांतता व सलोख्याला बळकटी मिळेल.जगाला केले आश्वस्तया चाचणीबाबत जगाला आश्वस्त करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानेही निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, बाह्य अंतराळात असलेल्या भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. ही सुरक्षितता साध्य करण्यात आम्ही किती सक्षम आहोत, याची खातरमजा करण्यासाठी भारताने ही चाचणी केली. खात्रीने यश मिळेल याचा आत्मविश्वास आल्यावर आम्ही चाचणी केली. यावरून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याचा भारत सरकारचा हेतू स्पष्ट होतो.मोहीम यशस्वी करण्यात सहभागी झालेल्यांचे अभिनंदनही मोहीम यशस्वी करण्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करून मोदी म्हणाले की, ‘मिशन शक्ती खूप गुंतागुंतीचे होते. अत्यंत वेगवान पद्धतीचे हे मिशन लक्षणीय अचूकतेने अवघ्या तीन मिनिटांत फत्ते केले गेले. यावरून आपल्या थोर वैज्ञानिकांचे कमालीचे चातुर्य व आपल्या अवकाश कार्यक्रमाचे यश अधोरेखित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMission Shaktiमिशन शक्ती