शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

काश्मीरमध्ये सुरक्षा कपात, १० हजार जवान काढून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 03:39 IST

या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर या संवेदनशील आणि सीमेवरील केंद्रशासित प्रदेशात सुरक्षाव्यवस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विविध केंद्रीय निमलष्करी दलांचे १० हजार जवान तात्काळ तेथून काढून घेण्यात येणार आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांमध्ये आतापर्यंत एकाच वेळी केली जाणारी ही सर्वात मोठी कपात असेल. जम्मू-काश्मीरमध्ये एरवी मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात असतातच.गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी त्या राज्याचा विशेष दर्र्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर तेथे केंद्रीय निमलष्करी दलांच्या वाढीव तुकड्या पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच वाढीव तुकड्या आता तेथून काढून घेण्यात येणार आहेत. या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.गेल्या मे महिन्यात १०, तर डिसेंबरमध्ये ७० तुकड्या काश्मीरमधून काढून घेण्यात आल्या होत्या. एका तुकडीत १०० जवान असतात. म्हणजे आताची कपात धरून गेल्या वर्षभरातील कपात एकूण १८ हजारांची असेल. तेथील सुरक्षा परिस्थितीचा समग्र आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, संबंधित केंद्रीय निमलष्करी दलाने कमी केलेल्या तुकड्यांना विमानाने काश्मीरमधून देशाच्या अन्य भागांतील त्यांच्या छावण्यांमध्ये नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय घेताना सुरक्षेच्या निकडीखेरीज दीर्घकाळ तेथे राहिलेल्या तुकड्यांना आराम व फेरप्रशिक्षण देण्याची गरज, काश्मीरमधील तोंडावर आलेला कडक हिवाळा याचाही विचार केला गेला आहे. बºयाच तुकड्या काश्मीरमध्ये पक्क्या इमारतींमध्ये नव्हे, तर तंबू-राहुट्यांमध्ये राहत होत्या.