शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये सुरक्षा कपात, १० हजार जवान काढून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 03:39 IST

या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर या संवेदनशील आणि सीमेवरील केंद्रशासित प्रदेशात सुरक्षाव्यवस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विविध केंद्रीय निमलष्करी दलांचे १० हजार जवान तात्काळ तेथून काढून घेण्यात येणार आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांमध्ये आतापर्यंत एकाच वेळी केली जाणारी ही सर्वात मोठी कपात असेल. जम्मू-काश्मीरमध्ये एरवी मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात असतातच.गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी त्या राज्याचा विशेष दर्र्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर तेथे केंद्रीय निमलष्करी दलांच्या वाढीव तुकड्या पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच वाढीव तुकड्या आता तेथून काढून घेण्यात येणार आहेत. या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.गेल्या मे महिन्यात १०, तर डिसेंबरमध्ये ७० तुकड्या काश्मीरमधून काढून घेण्यात आल्या होत्या. एका तुकडीत १०० जवान असतात. म्हणजे आताची कपात धरून गेल्या वर्षभरातील कपात एकूण १८ हजारांची असेल. तेथील सुरक्षा परिस्थितीचा समग्र आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, संबंधित केंद्रीय निमलष्करी दलाने कमी केलेल्या तुकड्यांना विमानाने काश्मीरमधून देशाच्या अन्य भागांतील त्यांच्या छावण्यांमध्ये नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय घेताना सुरक्षेच्या निकडीखेरीज दीर्घकाळ तेथे राहिलेल्या तुकड्यांना आराम व फेरप्रशिक्षण देण्याची गरज, काश्मीरमधील तोंडावर आलेला कडक हिवाळा याचाही विचार केला गेला आहे. बºयाच तुकड्या काश्मीरमध्ये पक्क्या इमारतींमध्ये नव्हे, तर तंबू-राहुट्यांमध्ये राहत होत्या.