शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काश्मीरमध्ये सुरक्षा कपात, १० हजार जवान काढून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 03:39 IST

या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर या संवेदनशील आणि सीमेवरील केंद्रशासित प्रदेशात सुरक्षाव्यवस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विविध केंद्रीय निमलष्करी दलांचे १० हजार जवान तात्काळ तेथून काढून घेण्यात येणार आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांमध्ये आतापर्यंत एकाच वेळी केली जाणारी ही सर्वात मोठी कपात असेल. जम्मू-काश्मीरमध्ये एरवी मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात असतातच.गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी त्या राज्याचा विशेष दर्र्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर तेथे केंद्रीय निमलष्करी दलांच्या वाढीव तुकड्या पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच वाढीव तुकड्या आता तेथून काढून घेण्यात येणार आहेत. या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.गेल्या मे महिन्यात १०, तर डिसेंबरमध्ये ७० तुकड्या काश्मीरमधून काढून घेण्यात आल्या होत्या. एका तुकडीत १०० जवान असतात. म्हणजे आताची कपात धरून गेल्या वर्षभरातील कपात एकूण १८ हजारांची असेल. तेथील सुरक्षा परिस्थितीचा समग्र आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, संबंधित केंद्रीय निमलष्करी दलाने कमी केलेल्या तुकड्यांना विमानाने काश्मीरमधून देशाच्या अन्य भागांतील त्यांच्या छावण्यांमध्ये नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय घेताना सुरक्षेच्या निकडीखेरीज दीर्घकाळ तेथे राहिलेल्या तुकड्यांना आराम व फेरप्रशिक्षण देण्याची गरज, काश्मीरमधील तोंडावर आलेला कडक हिवाळा याचाही विचार केला गेला आहे. बºयाच तुकड्या काश्मीरमध्ये पक्क्या इमारतींमध्ये नव्हे, तर तंबू-राहुट्यांमध्ये राहत होत्या.