शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेत झाले 1 कोटी बेरोजगार; ‘सीएमआयई’चे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 05:50 IST

९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले

मुंबई : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सुमारे १ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) मुख्य कार्यकारी महेश व्यास यांनी दिली.व्यास यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मेअखेरीस बेरोजगारीचा दर १२ टक्के होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये तो ८ टक्के होता. याचाच अर्थ असा की, देशातील तब्ब्ल एक कोटी भारतीयांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. रोजगार गमावण्यामागे कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग हे मुख्य कारण आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली झाल्यानंतर या समस्या अंशत: कमी होतील. मात्र पूर्णत: संपणार नाहीत. व्यास यांनी सांगितले की, ज्यांनी आपला रोजगार गमावला आहे, त्यांना नवा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होतात. मात्र, अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुन्हा तयार होण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागतो. ‘सीएमआयई’ने देशातील १.७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी केवळ ३ टक्के उत्तरदात्यांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे नमूद केले. ५५ टक्के लोकांनी उत्पन्न घटल्याचे नमूद केले. ४२ टक्के लोकांनी उत्पन्न आदल्या वर्षीएवढे स्थिर राहिल्याचे सांगितले. यात वाढलेली महागाई समायोजित केल्यास ९७ टक्के कुटुंबाच्या उत्पन्नात घट झाल्याचे आढळून येईल.बेरोजगारीचा चार टक्के दर मानला जातो सामान्य मे २०२० मध्ये बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर गेला होता. कारण गेल्या वर्षी राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्यात आले होते. अनेक जाणकारांच्या मते कोविड-१९ची दुसरी लाट आता शिखरावर असून, यापुढे तिची घसरण सुरू होईल. त्याबरोबर राज्ये अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात करतील. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ३ ते ४ टक्के बेरोजगारीचा दर सामान्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी