शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेत झाले 1 कोटी बेरोजगार; ‘सीएमआयई’चे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 05:50 IST

९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले

मुंबई : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सुमारे १ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) मुख्य कार्यकारी महेश व्यास यांनी दिली.व्यास यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मेअखेरीस बेरोजगारीचा दर १२ टक्के होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये तो ८ टक्के होता. याचाच अर्थ असा की, देशातील तब्ब्ल एक कोटी भारतीयांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. रोजगार गमावण्यामागे कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग हे मुख्य कारण आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली झाल्यानंतर या समस्या अंशत: कमी होतील. मात्र पूर्णत: संपणार नाहीत. व्यास यांनी सांगितले की, ज्यांनी आपला रोजगार गमावला आहे, त्यांना नवा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होतात. मात्र, अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुन्हा तयार होण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागतो. ‘सीएमआयई’ने देशातील १.७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी केवळ ३ टक्के उत्तरदात्यांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे नमूद केले. ५५ टक्के लोकांनी उत्पन्न घटल्याचे नमूद केले. ४२ टक्के लोकांनी उत्पन्न आदल्या वर्षीएवढे स्थिर राहिल्याचे सांगितले. यात वाढलेली महागाई समायोजित केल्यास ९७ टक्के कुटुंबाच्या उत्पन्नात घट झाल्याचे आढळून येईल.बेरोजगारीचा चार टक्के दर मानला जातो सामान्य मे २०२० मध्ये बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर गेला होता. कारण गेल्या वर्षी राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्यात आले होते. अनेक जाणकारांच्या मते कोविड-१९ची दुसरी लाट आता शिखरावर असून, यापुढे तिची घसरण सुरू होईल. त्याबरोबर राज्ये अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात करतील. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ३ ते ४ टक्के बेरोजगारीचा दर सामान्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी