शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

दुसऱ्या लाटेमुळे देशाला चुकवावी लागली मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 09:07 IST

रिझर्व्ह बँक : माहितीची चोरी; सायबर हल्ल्यांपासून मोठा धोका

ठळक मुद्देकोरोना साथीमुळे वित्तीय संस्थांना वाटले होते त्यापेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच, पण आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. एप्रिल महिन्यात भारताची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. पण मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या प्रारंभापासून ती स्थिती सुधारू लागली आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटले आहे. माहितीची चोरी व सायबर हल्ल्यांचे वाढते प्रमाण यामुळेही अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले की, कोरोना साथीमुळे वित्तीय संस्थांना वाटले होते त्यापेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच, पण आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. बँकांकडील अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण मार्च महिन्यात ७.५ टक्के होते. सप्टेंबर २०२० मध्येही हाच आकडा होता. मात्र आता हे प्रमाण मार्च २०२२ पर्यंत ९.८० टक्के होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने एक अहवाल तयार केला आहे. त्यात या बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटले आहे की, कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. प्रतिबंधात्मक उपायही योजण्यात येत आहेत. यामुळे आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येईल अशी आशा पल्लवित झाली आहे. असे असले तरी आगामी काळात आणखी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. संभाव्य लाटा कशा स्वरूपाच्या असतील, ते आताच सांगणे शक्य नाही. मात्र त्यामुळे होणारे नुकसान थोपविण्यास पावले उचलावी लागतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक